शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांना सोबत घेऊनच ‘नवभारत’ उभारणे शक्य

By admin | Updated: April 24, 2017 04:02 IST

देशातील सर्व राज्ये आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत एकजुटीने प्रयत्न आणि सहकार्य केले तरच ‘नवभारत’ उभारणीचे स्वप्न साकार होऊ शकेल

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्ये आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत एकजुटीने प्रयत्न आणि सहकार्य केले तरच ‘नवभारत’ उभारणीचे स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला आणि यासाठी सर्वांनी ‘टीम इंडिया’ बनून कामाला लागण्याचे आवाहन केले.‘निती’ आयोगाच्या नियामक परिषदेच्या तिसऱ्या बैठकीच्या सुरुवातीस व समारोपास पंतप्रधानांनी आपले विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले तसा भारत सन २०२२ मध्ये येणाऱ्या स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवापर्यंत प्रत्यक्ष साकार करण्यासाठी केवळ राज्य सरकारांनीच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी व स्वयंसेवी संघटना सर्वांनी लक्ष्ये ठरवून घ्यावी आणि ती साध्य करण्यासाठी ‘मिशन मो’मध्ये कामाला लागावे, यावर त्यांनी भर दिला.बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मताशी सहमत होऊन मोदी यांनी देशपातळीवर व राज्यांच्या विविध प्रदेशांमध्ये असलेला असमतोल दूर करण्यासाठी अग्रक्रमाने उपाय योजण्यावर भर दिला. वैचारिक आणि राजकीय मतभेद असूनही केंद्र आणि राज्यांमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यावर झालेले एकमत हे भारताच्या संघराज्यीय व्यवस्थेच्या निर्धाराचे आणि एकीचेच फलित आहे,असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, ‘जीएसटी’ हे ‘एक राष्ट्र, एक आकांक्षा व एक निर्धार’ यांचेच प्रतिक असून त्याची इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल. ‘जीएसटी’साठी राज्यांनी त्यांच्या पातळीवर करायचे कायदे वेळेत करण्याचेही त्यांनी आवाहन केले.‘निती’ आयोगामुळे कामाच्या स्वरूपात आमुलाग्र्र बदल झाला आहे. आता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या योजनांना मंजुरी घेण्यासाठी आयोगाकडे यावे लागत नाही. उलट राज्यांनीच योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी यासाठी सहभागी व्हावे यावर भर दिला जात आहे. शिवाय केवळ सरकारी बाबूंवर अवलंबून न राहता जेथे कुठे नव्या कल्पना व विचार मिळू शकेल अशा सर्वांना देशाच्या नवनिर्माणात सामिल करून घेतले जात आहे, असे मोदी म्हणाले.सर्व राज्यांचे मुख्यमंत्री ‘निती’ आयोगाच्या नियामक परिषदेचे पदसिद्ध सदस्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी न पाठविता स्वत: हजर राहावे, असे पंतप्रधानांकडून कळविण्यात आल्याने पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी व दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचा अपवाद वगळता सर्व मुख्यमंत्री रविवारच्या बैठकीला उपस्थि होते. ‘सुशासन’ हाच एकमेव मार्ग : गेल्या दोन वर्षांत केंद्राकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत ४० टक्के वाढ झाली आहे तर केंद्रीय योजनांवर करावा लागणारा खर्च ४० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे राज्यांनी भांडवली खर्च व पायाभूत सुविधा उभारणीवर भर द्यावा, असेही त्यांनी आग्रही प्रतिपादन केले. पुरेशी साधने उपलब्ध नसूनही आहेत त्या साधनसुविधांचा जास्तीत जास्त व उत्पादक उपयोग होण्यासाठी ‘सुशासन’ हाच एकमेव मार्ग आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

एकत्रित निवडणुकांचा आग्रहलोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दाही मोदींनी बैठकीत मांडला व यावर विधायक चर्चा सुरू झाली आहे, यावर समाधान व्यक्त केले. आर्थिक आणि राजकीय अव्यवस्थेमुळे भारताने फार काळ सोसले आहे. वेळेचे नीट व्यवस्थापन न केल्याने अनेक चांगले विचार व योजनांची अपेक्षित फळे मिळू शकली नाहीत. त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल व विषम असली तरी सशक्तपणे काम करू शकेल, अशी व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.वित्तीय वर्षात बदलकेंद्राने अर्थसंकल्पाची तारीख बदलून व सरकारी खर्चाची योजना व योजनाबाह्य अशी वर्गवारी रद्द करून ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे आणि वित्तीय वर्ष बदलण्याचा विचार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.१५ वर्षांची कृती योजनाराज्यांकडून मिळालेली माहिती व सूचना यांचा विचार करून देशाच्या पुनरुत्थानासाठी ‘निती‘ आयोगाने १५ वर्षांची दूरगामी योजना, सात वर्षांची धोरण योजना व तीन वर्षांची धडक कृती योजना असा तीन टप्प्यांचा आराखडा तयार केला आहे. यात ३०० हून अधिक बाबींवर खासकरून भर देण्यात आला आहे. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी याची रूपरेषा बैठकीत मांडली. नीती आयोगाच्या बैठकीत फडणवीस यांच्या कामाचे कौतुक नीती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली. राज्यात कृषि क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याबाबत यावेळी फडणवीस यांची पाठ थोपटण्यात आली. फडणवीस यांनी यावेळी शेती क्षेत्रातील योजनांवर भाष्य केले. डाळींचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काही सल्ले दिले.