शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो 2 : काणकोण

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

काणकोणात वानरांचा उच्छाद

काणकोणात वानरांचा उच्छाद
- फळबागायतींची नासाडी; गावठी फळे महागली
काणकोण : काणकोणात वानरांकडून बागायतीतील फळांचा विध्वंस मोठय़ा प्रमाणात वाढल्याने बागायतदार शेतकर्‍यांना अपरिमित नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे गावठी फळांचे दर आकाशाला भिडले आहेत. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यातयेत आहे.
काणकोणात लोकवस्तीच्या ठिकाणी वानरांच्या बर्‍याच टोळ्या आहेत. हे वानर घरांच्या छतावरून उड्या मारत फिरतात. त्यामुळे कौले, सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान होते. ऐन पावसाळ्यात कौले फुटल्याने घरात पावसाचे पाणी येते. पावसाळ्यातती बदलणेही कठीण होऊन जाते.
मोठय़ा वानरांचे दिवस-रात्र बागायतीत वास्तव्य असते. शेवग्याच्या झाडावर आलेली कोवळी पाने वानर खातात. शेवग्याच्या शेंगा येण्याआधीच कोवळ्या फांद्या मोडून खातात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन कमालीचे घटल्याने दहा रुपयाला तीन-चार शेंगा असा दर झाला आहे. पावसाळ्यातील नीरफणसांचा वानरांकडून फडशा पाडला जातो. खेडेगावात प्रत्येक घराच्या आवारात नीरफणसाचे झाड लावले जायचे. माकडांच्या त्रासामुळे असलेले झाडही तोडून टाकण्याकडे कल वाढला आहे. 10-15 रुपयांना एक या दराने मिळणार्‍या नीरफणसाचा दर 60 ते 75 रुपयांवर पोचला आहे. शहरात तर हा दर 100ते 150 रुपयांपर्यंत वाढला आहे. चिकू, केळी यांचीही नासाडी वानरांकडून केली जात आहे. त्यामुळे या भागातील केळ्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. 75 ते 80 रुपये डझन याप्रमाणे केळी बाजारात विकली जातात. आंबा-फणसाच्या मोसमातही वानरांची चंगळ असते. झाडावरील आंबे व फणस यांचा फडशा वानर पाडतात. हाकलले तरी सहसा जात नाहीत. छोटे वानर (खेतीं) कच्चे नारळ खातात. त्यामुळे नारळाच्या उत्पादनात घट झाली आहे. अलीकडे तर वानर वाहनांवर बसून वाहनाचे आरसे फोडून नुकसान करू लागले आहेत. या वानरांचा वन खात्याने सोक्षमोक्ष लावला तर अनेक प्रकारची नुकसान टळेल, असे र्शीकांत सुधीर यांनी सांगितले.
कोट
‘‘
या वानरांचा बंदोबस्त करायला हवा. कृषी खात्याकडून अनुदान दिले नसले तरी चालेल; पण वानरांचा बंदोबस्त केला तर पुरेसे उत्पादन नक्कीच मिळेल. - विजयकुमार प्रभुगावकर असे प्रभुगावकर, बागायतदार, महालवाडा-पैंगीण