शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

हेलो 1 : गोमंतकीय आयपीएस बनण्यास अनुत्सुक

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

डीआयजी व्यास यांची खंत

डीआयजी व्यास यांची खंत
पणजी : गोव्यात बुद्धिमत्तेची वाण नाही; परंतु गोव्यातील तरुणांचा गोव्याबाहेर काम करण्याचा कल कमी असल्यामुळे आयपीएस सेवेत गोमंतकीय युवक दाखल होत नसल्याची खंत पोलीस उपमहानिरीक्षक व एसआयटीचे प्रमुख म्हणून पदभारातून नुकतेच मुक्त झालेले के. के. व्यास यांनी व्यक्त केली. दिल्ली येथे बदली फर्मावण्यात आलेले व्यास यांनी गोव्याचा निरोप घेण्यापूर्वी ‘लोकमत’च्या कार्यालयात दिलखुलास गप्पा केल्या.
गोव्यातील तरुण गोव्याबाहेर जाण्यास कमी इच्छुक असतात. त्यामुळेच आयपीएसमध्ये गोव्यातील तरुणांची संख्या कमी आहे. अर्थातच बुद्धिमत्तेच्या बाबतीत गोवा मागे नाही. आवश्यक प्रमाणात जागृती केल्यास गोव्यातूनही पुढे आयपीएस निघतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यासाठी स्वतंत्र आयपीएस कॅडर बनविण्याएवढी गोव्याची लोकसंख्या नाही, असे ते म्हणाले.
गोव्यातील माझा सेवाकाळ हा अत्यंत चांगला राहिला. येथील लोक फार चांगले आहेत. येथे आंदोलकही नीतिमत्ता पाळून आंदोलन करतात, ही गोष्ट मी पहिल्यांदाच पाहिली. गोव्यात इतर ठिकाणाहून अतिरेकी, नक्षलवादीही सराईत येऊन राहिले असले तरी गोवा हे अशा लोकांसाठी सुरक्षित ठिकाण असे म्हणता येणार नाही; कारण असे गुन्हेगार व नक्षलवादी पकडलेही गेले आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
नायजेरियनचा पर्वरी येथील रास्ता रोको प्रकरण आपल्या गोव्यातील कार्यकाळातील अत्यंत मोठी महत्त्वपूर्ण घटना आहे. त्या वेळी पोलीस खात्याचे ज्येष्ठ अधिकारी राज्याबाहेर होते आणि योगायोगाने आपणच सर्वात ज्येष्ठ अधिकारी होतो. स्थानिकांची गर्दी वाढल्यानंतर त्यांच्यापासून नायजेरियनना सुरक्षितपणे हलविणे ही जबाबदारी पोलीस खात्याची होती. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळण्यात आले.
व्यास यांची बदली दिल्ली येथे गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून झाली आहे. गोव्यातील गुप्तचर यंत्रणांच्या बाबतीत बोलताना मात्र त्यांनी अजून खूप सुधारणात वाव असल्याचे सांगितले. माहिती गोळा करण्याच्या विशिष्ठ प्रशिक्षणाला पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.
लोकमत परिवारातर्फे व्यास यांना ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांच्या हस्ते त्यांना मानपत्र भेट देण्यात आले. (प्रतिनिधी)

(बॉक्स)
राजकीय हस्तक्षेप नाही
पोलीस खाते हे नेहमीच राजकीय इशार्‍यावर काम करीत असल्याचे आरोप होत असतात. याविषयी व्यास यांना विचारले असता त्यांनी आतापर्यंत तर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप पाहिलेला नाही, असे सांगितले. राजकीय हस्तक्षेप होत आहे असे गृहीत धरून चालले तरी तो अत्यंत नगण्य असावा, असे ते म्हणाले. शेवटी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली किती पर्यंत झुकावे हे अधिकार्‍यावर अवलंबून असते.