शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढणार

By admin | Updated: June 13, 2014 02:39 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़

अहमदाबाद/नवी दिल्ली : निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़ आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुजरात सरकारला नर्मदा धरण अर्थात सरदार सरोवर या देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास आणि त्यास दरवाजे लावण्यास मंजुरी मिळाली आहे़गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर उण्यापुऱ्या १५ दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणा(एनसीए)च्या अंतिम परवानगीनंतर आज गुरुवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली़ गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हा निर्णय जाहीर केला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने (एनसीए) नर्मदा धरणाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले़ गुजरातसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे त्या म्हणाल्या़ या निर्णयासाठी आनंदीबेन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या जनतेकडून धन्यवाद़ अनेक वर्षे रखडलेला एक निर्णय मार्गी लागला़ चांगले दिवस आले आहेत, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली़ यापश्चात केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी एका पत्रपरिषदेत नर्मदा धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देण्यात आल्याचा वृत्ताला दुजोरा दिला़ उंची वाढविण्याच्या निर्णयानंतर गुजरातच्या केवडियास्थित नर्मदा धरणाची उंची १२१़९२ मीटरवरून वाढून १३८़७२ मीटर होईल़ नर्मदा बचाओ आंदोलनासह अनेक स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींचा सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविण्यास विरोध होता़ प्रकल्पाची उंची वाढविल्याने सुमारे अडीच लाख लोक विस्थापित होतील, असे त्यांचे म्हणणे होते़ गुजरात सरकारने मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी लावून धरली होती़ प्रकल्पाची उंची न वाढविल्यामुळे आणि त्यावर दरवाजे नसल्याने वार्षिक ३७८८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गुजरात सरकारचा दावा होता़ राज्य सरकारच्या मते, उंची वाढविल्यामुळे ६़८ लाख हेक्टर जमीन अतिरिक्त सिंचनाखाली जाईल़ ४० टक्के वीज उत्पादन वाढेल. यापूर्वी २००६मध्ये नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने प्रकल्पाची उंची ११०़६४ मीटरवरून वाढवून १२१़९२ करण्यास परवानगी दिली होती़ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ५ एप्रिल १९६१ रोजी नर्मदा धरणाची कोनशिला ठेवली होती़ या धरणामुळे प्रभावित लोकांच्या विस्थापनावरून हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता़ (लोकमत न्युज नेटवर्क)