शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढणार

By admin | Updated: June 13, 2014 02:39 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़

अहमदाबाद/नवी दिल्ली : निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़ आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुजरात सरकारला नर्मदा धरण अर्थात सरदार सरोवर या देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास आणि त्यास दरवाजे लावण्यास मंजुरी मिळाली आहे़गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर उण्यापुऱ्या १५ दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणा(एनसीए)च्या अंतिम परवानगीनंतर आज गुरुवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली़ गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हा निर्णय जाहीर केला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने (एनसीए) नर्मदा धरणाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले़ गुजरातसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे त्या म्हणाल्या़ या निर्णयासाठी आनंदीबेन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या जनतेकडून धन्यवाद़ अनेक वर्षे रखडलेला एक निर्णय मार्गी लागला़ चांगले दिवस आले आहेत, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली़ यापश्चात केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी एका पत्रपरिषदेत नर्मदा धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देण्यात आल्याचा वृत्ताला दुजोरा दिला़ उंची वाढविण्याच्या निर्णयानंतर गुजरातच्या केवडियास्थित नर्मदा धरणाची उंची १२१़९२ मीटरवरून वाढून १३८़७२ मीटर होईल़ नर्मदा बचाओ आंदोलनासह अनेक स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींचा सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविण्यास विरोध होता़ प्रकल्पाची उंची वाढविल्याने सुमारे अडीच लाख लोक विस्थापित होतील, असे त्यांचे म्हणणे होते़ गुजरात सरकारने मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी लावून धरली होती़ प्रकल्पाची उंची न वाढविल्यामुळे आणि त्यावर दरवाजे नसल्याने वार्षिक ३७८८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गुजरात सरकारचा दावा होता़ राज्य सरकारच्या मते, उंची वाढविल्यामुळे ६़८ लाख हेक्टर जमीन अतिरिक्त सिंचनाखाली जाईल़ ४० टक्के वीज उत्पादन वाढेल. यापूर्वी २००६मध्ये नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने प्रकल्पाची उंची ११०़६४ मीटरवरून वाढवून १२१़९२ करण्यास परवानगी दिली होती़ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ५ एप्रिल १९६१ रोजी नर्मदा धरणाची कोनशिला ठेवली होती़ या धरणामुळे प्रभावित लोकांच्या विस्थापनावरून हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता़ (लोकमत न्युज नेटवर्क)