शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढणार

By admin | Updated: June 13, 2014 02:39 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़

अहमदाबाद/नवी दिल्ली : निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़ आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुजरात सरकारला नर्मदा धरण अर्थात सरदार सरोवर या देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास आणि त्यास दरवाजे लावण्यास मंजुरी मिळाली आहे़गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर उण्यापुऱ्या १५ दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणा(एनसीए)च्या अंतिम परवानगीनंतर आज गुरुवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली़ गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हा निर्णय जाहीर केला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने (एनसीए) नर्मदा धरणाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले़ गुजरातसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे त्या म्हणाल्या़ या निर्णयासाठी आनंदीबेन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या जनतेकडून धन्यवाद़ अनेक वर्षे रखडलेला एक निर्णय मार्गी लागला़ चांगले दिवस आले आहेत, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली़ यापश्चात केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी एका पत्रपरिषदेत नर्मदा धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देण्यात आल्याचा वृत्ताला दुजोरा दिला़ उंची वाढविण्याच्या निर्णयानंतर गुजरातच्या केवडियास्थित नर्मदा धरणाची उंची १२१़९२ मीटरवरून वाढून १३८़७२ मीटर होईल़ नर्मदा बचाओ आंदोलनासह अनेक स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींचा सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविण्यास विरोध होता़ प्रकल्पाची उंची वाढविल्याने सुमारे अडीच लाख लोक विस्थापित होतील, असे त्यांचे म्हणणे होते़ गुजरात सरकारने मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी लावून धरली होती़ प्रकल्पाची उंची न वाढविल्यामुळे आणि त्यावर दरवाजे नसल्याने वार्षिक ३७८८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गुजरात सरकारचा दावा होता़ राज्य सरकारच्या मते, उंची वाढविल्यामुळे ६़८ लाख हेक्टर जमीन अतिरिक्त सिंचनाखाली जाईल़ ४० टक्के वीज उत्पादन वाढेल. यापूर्वी २००६मध्ये नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने प्रकल्पाची उंची ११०़६४ मीटरवरून वाढवून १२१़९२ करण्यास परवानगी दिली होती़ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ५ एप्रिल १९६१ रोजी नर्मदा धरणाची कोनशिला ठेवली होती़ या धरणामुळे प्रभावित लोकांच्या विस्थापनावरून हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता़ (लोकमत न्युज नेटवर्क)