शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

अधिकारवादावर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 00:07 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच गुरुवारी केजरीवाल सरकारही हा वाद घेऊन उच्च न्यायालयात पोहोचले.

नवी दिल्ली : अधिकार क्षेत्रावरून केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच गुरुवारी केजरीवाल सरकारही हा वाद घेऊन उच्च न्यायालयात पोहोचले. केंद्र आणि केजरीवाल सरकार या दोन्हींच्या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने उद्याचा दिवस केंद्र आणि दिल्ली सरकारच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.अधिकार क्षेत्राच्या वाटणीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतील मुद्दे ‘संदिग्ध’ असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने २५ मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्याच दिवशी केजरीवाल सरकारने उच्च न्यायालयात धाव घेत, राजधानीत नोकरशहांच्या नियुक्तींसंदर्भात केंद्राच्या अधिसूचनेविरुद्ध याचिका दाखल केली. दिल्लीचे नायब राज्यपाल हे प्रशासकीय प्रमुख असल्याचे या अधिसूचनेत म्हटले होते.गत ५ मे रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी वरिष्ठ नोकरशहा शकुंतला गॅमलीन यांची दिल्लीच्या हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. यानंतर जंग आणि केजरीवाल सरकार यांच्या अधिकार क्षेत्रावरून संघर्ष सुरू झाला होता. दरम्यान, नजीब जंग यांनी गुरुवारी दिल्ली सरकारसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांची भेट घेतली. नायब राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात अधिसूचना विरोधातील ठराव विधानसभेने बुधवारी पारित केला. ४दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्या अधिकारासंदर्भातील अधिसूचनेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी तातडीने सुनावणी घेणार आहे. ४अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महिंद्रा सिंह यांच्या वतीने केंद्राची याचिका न्या. ए. के. सिकरी आणि न्या. यू. यू. ललित यांच्या सुटीकालीन खंडपीठासमक्ष आणली गेली. ४उच्च न्यायालयाच्या टिपणीमुळे अनिश्चितता निर्माण झाली असून राजधानीत दैनंदिन प्रशासकीय कारभार चालवणे कठीण झाले आहे, त्यामुळे केंद्राच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, असे सिंह म्हणाले.४गत २५ मे रोजी दिल्ली पोलिसांच्या एक हेड कॉन्स्टेबलची जामीन याचिका खारीज करताना, दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेला (एसीबी) पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते. ४शिवाय अधिकार क्षेत्राच्या वाटणीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतील मुद्दे ‘संदिग्ध’ असल्याची टिपणीही केली होती. उच्च न्यायालयाच्या या टिपणीला गृहमंत्रालयाने आव्हान दिले आहे.