शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

त्यांनी खूप दिले, आम्ही किती घेतले?

By admin | Updated: July 28, 2015 05:31 IST

आयुष्यात कोणतीही खटपट न करता ते या पदावर पोचले होते. त्यांच्या जीवनात विक्रम साराभाई किंवा मेनन यांच्यासारख्यांनी केलेली वैचारिक क्रांती जाणून घेण्यासाठी त्यांचे ‘विंंग्ज आॅफ फायर’

आयुष्यात कोणतीही खटपट न करता ते या पदावर पोचले होते. त्यांच्या जीवनात विक्रम साराभाई किंवा मेनन यांच्यासारख्यांनी केलेली वैचारिक क्रांती जाणून घेण्यासाठी त्यांचे ‘विंंग्ज आॅफ फायर’ हे आत्मचरित्रच वाचायला हवे. त्यात ते एके ठिकाणी लिहितात, ‘‘काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावलं उमटवायची असतील तर ती फरफटू नका.’’ आणखी एके ठिकाणी ते लिहितात, ‘‘येणाऱ्या दिवसांसाठी तयारीत राहा. त्यांना सारखेच सामोरे जा. जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल!’’२६ जानेवारी २००३ रोजी गणराज्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताला विकसित राष्ट्र करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, ‘‘शिक्षणामुळे विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता समोर यायला हवी. उपक्रमशीलतेने ज्ञान मिळते आणि ज्ञान ही राष्ट्राची संपत्ती असते. ग्रामीण भागाशी चार तऱ्हेने संपर्क साधण्यातच मुक्ती आहे. हा संपर्क रस्त्यांच्या द्वारा, दूरसंचार यंत्रणेद्वारा, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि आर्थिक प्रगतीतून साध्य होईल. त्यासाठी नागरिकांचा देशाच्या उभारणीत कृतिशील सहभाग असायला हवा. राष्ट्राकडून काही मिळविण्याची अपेक्षा न बाळगता राष्ट्राला काहीतरी देण्याची वृत्ती बाळगावी!’’ नवी दिल्ली येथे एप्रिल २००५ मध्ये झालेल्या इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या सेमिनारमध्ये भाषण करताना ए.पी.जे. कलाम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानात करिअर करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी पुढील उपाययोजना सुचविली. ते म्हणाले, ‘‘विज्ञानाशी बांधिलकी असणाऱ्या उच्च दर्जाच्या विद्यार्थ्यांना विज्ञानात करिअर करण्याची खात्री असावी यासाठी दरवर्षी एम.एस्सी. केलेले ३०० विद्यार्थी आणि डॉक्टरेट केलेले १०० विद्यार्थी यांना इस्रो, डी.आर.डी.ओ., अ‍ॅटॉमिक एनर्जी, सी.एस.आय.आर., डी.एस.टी. आणि विभिन्न विद्यापीठे यांच्यात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

- झांझीदार येथील भाषणातून(पुनर्मुद्रित).