शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

दहशतीचे वातावरण - केजरीवाल

By admin | Updated: November 16, 2016 01:16 IST

मोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे. अनेक विवाह स्थगित झाले आहेत, तर काही मोडले आहेत. मुलीच्या विवाह सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या जनार्दन रेड्डीच्या घरी मोदी सरकार सीबीआयला पाठवीत नाही. अडीच लाखांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या सामान्य माणसाच्या मात्र हात धुवून मागे लागले आहे, अशी जोरदार टीका करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्लीची विधानसभा बुधवारी दणाणून सोडली. नोटबंदीचा वादग्रस्त निर्णय राष्ट्रपतींनी थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. केजरीवाल म्हणाले, एकीकडे धनाढ्य उद्योग घराण्यांचे १ लाख १४ हजार कोटींचे कर्ज वर्षभरात निर्लज्जपणे माफ करण्याचे औदार्य मोदी सरकारने दाखवले. जन धन खात्यात थोडीफार रोख रक्कम जमा करणाऱ्या गरीबांना धमकावण्याचा खेळ सुरू झाला आहे. पनामा पेपर्स लीकमधे मोदींच्या मित्रांची नावे आहेत, ही बाब आता लपून राहिलेली नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात पंतप्रधानांचा थेट नामोल्लेख झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यालयात सीबीआयने धाड घातल्यानंतर २५ कोटींची बेहिशेबी रोकड सापडली तेव्हा अनेक गौप्यस्फोट झाले होते, असे सांगून केजरीवालांनी त्यात पंतप्रधानांचे नाव घेतले.