शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

'हवालाबाज' विकासात अडथळे आणत आहेत - मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

By admin | Updated: September 10, 2015 13:15 IST

केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे 'हवालाबाजां'च्या पायाखालची वाळू सरकली असून ते विकासात अडथळे आणत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. १० - केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे 'हवालाबाजां'च्या पायाखालची वाळू सरकली असून ते विकासात अडथळे आणत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले असल्याची टीका सोनिया गांधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे बसलेल्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नाही. सरकार विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस देशाच्या विकासात अडथळा आणत आहे. काँग्रेसच्या आडमुठी धोरणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प झालं आणि संपूर्ण पावसाळी अधिवेशन वाया गेले. देशासाठी महत्वाचे असलेले जीएसटी ( वस्तू व सेवा कर) विधेयक मंजूर होऊ शकले नाही,  असा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्षांना संसदेचे कामकाज चालावे असे वाटत होते, काँग्रेसमुळेच विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिकण्याची तयारी नसल्यामुळे एकेकाळी ४०० जागा जिंकणा-या काँग्रेसकडे आता फक्त ४० जागा उरल्या आहेत असे टीकास्त्र त्यांनी सोडले.  तसेच आमचे सरकार नुसती आश्वासने देत नाही तर ती आश्वासने प्रत्यक्षात आणण्याच्या योजना आमच्याकडे तयार असतात असेही ते म्हणाले. 
दरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या ( २ऑक्टोबर) निमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील गावागावांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.