शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद : एकीचे ‘आॅनर किलिंग’, दुसरीवर एकतर्फी प्रेमातून सूड

By admin | Updated: March 7, 2016 03:56 IST

पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र

राजस्थान, आंध्रात दोघींना जिवंत जाळलेजयपूर/ विजयवाडा : पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र प्रदेशात जिवंत जाळल्याच्या घटना घडल्या आहेत.राजस्थानातील घटना शुक्रवारी डुंगरपूर जिल्ह्याच्या पतलासा गावात घडली. त्या गावच्या रजपूत समाजातील रामेश्वरी देवी उर्फ रामो या तरुणीने आठ वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रकाश सेवक या ब्राह्मण मुलाशी विवाह केला होता. लग्नानंतर दोघेही वेगळे राहात होते. लग्नानंतर आठ वर्षांनी ती शुक्रवारी पहिल्यांदाच आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन सासरी आली तेव्हा तिच्या सख्ख्या व चुलत भावांनी तिला जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण सिंग व अन्य सहा जणांना शनिवारी अटक केली.रामेश्वरीला तिचा भाऊ लक्ष्मण सिंग आणि परवीन सिंग तसेच चुलत भाऊ कल्याणसिंग, ईश्वर सिंग, महेंद्र सिंग, भूपाल सिंग आणि गजेंद्र सिंग यांनी मिळून जिवंत जाळले, अशी तक्रार रामेश्वरीची सासू कलावती हिने पोलिसात दाखल केली आहे. ४ मार्च रोजी कलावती, तिचा धाकटा मुलगा, सून आणि रामेश्वरी हे सर्व जण अंगणात बसले असताना लक्ष्मणसिंग हा अन्य ३० जणांसह तेथे आला. त्याने रामेश्वरीला मारहाण केली आणि ओढत बाजूच्या मंदिराजवळ नेले आणि तेथे तिच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले.आंध्र प्रदेशातील घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चतापरु गावात घडली. पैदला इंदुमती या १७ वर्षांच्या मुलीचा गावातील डी. चिन्ना बाबू हा तरुण गेले अनेक दिवस पिच्छा पुरवत होता. यावरून इंदुमतीच्या घरच्या लोकांनी चिन्ना बाबूला काही दिवसांपूर्वी चोपही दिला होता. याचा सूड घेण्यासाठी शनिवारी इंदुमती एकटी असताना चिन्ना बाबू व त्याचा भाऊ पेड्डा बाबू घरात घुसले व त्यांनी रॉकेल ओतून तिला जाळले. ९० टक्के भाजलेल्या इंदुमतीला इस्पितळात हलविण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत तिने चिन्ना व पेड्डा बाबू यांची नावे सांगितल्याने त्यांना अटक केली गेली.