शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

हर्षा

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

टीम इंडियाची ताकद कमी झाली

टीम इंडियाची ताकद कमी झाली
हर्षा भोगले
भारतीय संघ गतविजेता असला तरी या वेळी या संघाचा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये समावेश नाही. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असते, तर गतचॅम्पियन संघाचा निश्चितच जेतेपदाच्या दावेदारामध्ये समावेश असता. पण, आता येथील परिस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद हिसकावल्या गेली आहे. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याची जगातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ ८ फलंदाज आणि ५ गोलंदाजांसह समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि काहीअंशी श्रीलंका संघाचा समतोल अशाच पद्धतीने साधला गेल्याचे दिसून येत आहे. उर्वरित संघांना चमकदार कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघही याच गटात मोडतो. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे. उमेश यादव व मोहंमद शमी यांच्याकडे प्रतिभा आहे; पण या दोन्ही गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे; पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यात ते अपयशी ठरले आहे. सामन्याचा निकाल सुरुवातीला विकेट घेण्यावर अवलंबून असतो. गोलंदाजांसाठी अखेरच्या षटकांत वर्चस्व गाजविण्यासाठी सुरुवातीला बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बळी घेण्यात यश मिळत नाही; त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश राखणे भारतीय गोलंदाजांना अडचणीचे भासत आहे.
०००