शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ५० विद्यार्थी शाळेतून पळाले

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण
५० विद्यार्थी शाळेतून पळाले
शेखपुरा : कॉलेजचे विद्यार्थी सतत रॅगिंग करीत असल्याने येथील नवोदय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री शाळेतून धूम ठोकली. पळालेले सर्व विद्यार्थी आठवीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
जिल्हाधिकारी प्रणवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याने हे विद्यार्थी जेरीस आले होते. तक्रारीनंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या भोजनानंतर हे विद्यार्थी वसतिगृहातून पळून गेले. शनिवारी सकाळच्या प्रार्थनेला आठवीचे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर प्राचार्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते पळून गेल्याचे समोर आले. विद्यालयातून रात्री पळून गेलेले विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी गोळा झाले. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी प्राचार्यांना पाचारण करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यास सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठविण्यात आले व पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद प्राचार्यांना देण्यात आली. शेखपुरा नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात ५०० विद्यार्थी राहतात. विद्यार्थी शाळेतून गायब झाल्यामुळे प्रशासन हादरून गेले होते.