शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग २)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच
या महोत्सवासाठी बऱ्याच वर्षांनी नागपुरात येणे झाले. इथे नेहमीच यावेसे वाटते पण देवाच्या मर्जीप्रमाणेच आपण पोहोचू शकतो. येथे अनेक मोठे कवी झाले. त्यांच्या नगरीत येणे म्हणजे देवस्थानालाच भेट देण्यासारखे आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट, ग्रेस हे मराठीतले श्रेष्ठ कवी इथलेच होते. त्यांच्या कवितांमधून ते आजही भेटतात. त्यांना भेटण्यासाठी बरेचदा नागपूरला येणे व्हायचे. त्यामुळेच नागपूर आवडते आणि येथील दर्दी रसिकही आवडतात. येथे गाणे सादर करण्यात आनंद वाटतो, असे आशाताई म्हणाल्या.
--------------
राजकारण हे माझे क्षेत्र नाही
मला राजकारणात कधीही यावेसे वाटले नाही. तो माझा स्वभावच नाही. राजकारण फार वेगळ्या लोकांसाठी आहे कदाचित ती गुणवत्ता माझ्याजवळ नाही. त्यात माझा स्वभाव अजिबातच राजकारणी नाही. आपल्या मनात जे येईल ते बोलून आपण मोकळे होतो. आपल्या घरातलेच राजकारण समजून घेता आले तरी पुरे, असे मला वाटते. मनमोकळे राहण्यातच तर खरी गंमत आहे. या वयातही मी गाणे म्हणते आणि लोकांना ते आवडते. लोक प्रेम करतात यापेक्षा अजून काय हवे? एखाद्या पुरस्कारापेक्षाही लोकांचे प्रेम मला जास्त महत्त्वाचे वाटते. देवाने भरभरून दिले असताना कशाला पुन्हा राजकारणात जायचे. आता मला काहीही मागायचे नाही आणि इच्छाही नाही.
----------
नागपूरकरांनी खूप प्रेम दिले
मुळात मंगेशकर कुटुंबाला नागपूर - विदर्भाने खूप प्रेम दिले आहे. त्याचा इतिहासच आहे. बळवंत नाट्य मंडळींसह माझे वडील दीनानाथ मंगेशकर येथे यायचे. त्यावेळी येथे दोन मजली नाट्यगृह होते. एकदा तर बाबांचे गाणे ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली की दुसरा मजलाच कोसळला होता. ही बाब मला आईने सांगितली. त्यावेळी मी खूपच लहान होते. त्यावेळी वडिलांना एका गीतासाठी २२ वेळा वन्समोअर मिळाला होता. त्यानंतर हृदयनाथवरही आणि माझ्यासह दीदींवरही विदर्भातल्या रसिकांनी खूप प्रेम केले. त्यामुळे विदर्भाशी आमचे ऋणानुबंध कायम जुळले आहेत. येथे आल्यावर मी भट आणि ग्रेस यांना खूप मिस करते.