शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग २)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच
या महोत्सवासाठी बऱ्याच वर्षांनी नागपुरात येणे झाले. इथे नेहमीच यावेसे वाटते पण देवाच्या मर्जीप्रमाणेच आपण पोहोचू शकतो. येथे अनेक मोठे कवी झाले. त्यांच्या नगरीत येणे म्हणजे देवस्थानालाच भेट देण्यासारखे आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट, ग्रेस हे मराठीतले श्रेष्ठ कवी इथलेच होते. त्यांच्या कवितांमधून ते आजही भेटतात. त्यांना भेटण्यासाठी बरेचदा नागपूरला येणे व्हायचे. त्यामुळेच नागपूर आवडते आणि येथील दर्दी रसिकही आवडतात. येथे गाणे सादर करण्यात आनंद वाटतो, असे आशाताई म्हणाल्या.
--------------
राजकारण हे माझे क्षेत्र नाही
मला राजकारणात कधीही यावेसे वाटले नाही. तो माझा स्वभावच नाही. राजकारण फार वेगळ्या लोकांसाठी आहे कदाचित ती गुणवत्ता माझ्याजवळ नाही. त्यात माझा स्वभाव अजिबातच राजकारणी नाही. आपल्या मनात जे येईल ते बोलून आपण मोकळे होतो. आपल्या घरातलेच राजकारण समजून घेता आले तरी पुरे, असे मला वाटते. मनमोकळे राहण्यातच तर खरी गंमत आहे. या वयातही मी गाणे म्हणते आणि लोकांना ते आवडते. लोक प्रेम करतात यापेक्षा अजून काय हवे? एखाद्या पुरस्कारापेक्षाही लोकांचे प्रेम मला जास्त महत्त्वाचे वाटते. देवाने भरभरून दिले असताना कशाला पुन्हा राजकारणात जायचे. आता मला काहीही मागायचे नाही आणि इच्छाही नाही.
----------
नागपूरकरांनी खूप प्रेम दिले
मुळात मंगेशकर कुटुंबाला नागपूर - विदर्भाने खूप प्रेम दिले आहे. त्याचा इतिहासच आहे. बळवंत नाट्य मंडळींसह माझे वडील दीनानाथ मंगेशकर येथे यायचे. त्यावेळी येथे दोन मजली नाट्यगृह होते. एकदा तर बाबांचे गाणे ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली की दुसरा मजलाच कोसळला होता. ही बाब मला आईने सांगितली. त्यावेळी मी खूपच लहान होते. त्यावेळी वडिलांना एका गीतासाठी २२ वेळा वन्समोअर मिळाला होता. त्यानंतर हृदयनाथवरही आणि माझ्यासह दीदींवरही विदर्भातल्या रसिकांनी खूप प्रेम केले. त्यामुळे विदर्भाशी आमचे ऋणानुबंध कायम जुळले आहेत. येथे आल्यावर मी भट आणि ग्रेस यांना खूप मिस करते.