शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भगवद्गीतेनंतर हनुमान चालिसाही उर्दूत

By admin | Updated: August 11, 2015 13:55 IST

उत्तर प्रदेशातील आबिद अल्वी या युवकाने हनुमान चालिसेचा उर्दूत अनुवाद केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे उर्दू रूपांतर प्रकाशित करीत लक्ष वेधून घेतले होते

लखनौ : उत्तर प्रदेशातील आबिद अल्वी या युवकाने हनुमान चालिसेचा उर्दूत अनुवाद केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे उर्दू रूपांतर प्रकाशित करीत लक्ष वेधून घेतले होते.जौनपूर येथे राहणाऱ्या आबिदने आता शिव चालिसा प्रार्थनेच्या अनुवादाची योजना आखली आहे. अशा लेखनकार्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायातील लोकांना परस्परांची संस्कृती आणि श्रद्धा समजून घेण्यास मदत होईल. प्रत्येक बंधात सहा ओळी याप्रमाणे एकूण १५ बंधात हनुमान चालिसेचा अनुवाद केला आहे. मी मुसाददास यांच्याप्रमाणे सहा ओळीत भाषांतर केले. चारोळीप्रमाणे मुसाददास यांनी सहा ओळींची पद्धत आणली होती, असे त्याने सांगितले. विदेशी भाविकांमुळे कल्पना सुचली मी वाराणसीला भेट दिली तेव्हा काही विदेशी भाविकांनी लोकांना हनुमान चालिसा म्हणायला सांगितले होते. त्यामुळे माझ्या मनात अनुवादाची कल्पना आली. मी हिंदीचा विद्यार्थी असलो तरी हनुमान चालिसा उर्दूत आणण्याचे काम हाती घेतले. चुका टाळण्याची खबरदारी घेत मी अनुवाद केला. त्यासाठी मला तीन महिने लागले, अशी माहितीही त्याने दिली. उर्दूची पुस्तके हिंदीत आणि हिंदीची पुस्तके उर्दूत भाषांतरित करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. लोकांनी परस्परांना समजून घेतले तर बंधुभाव, ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट होण्यास मदत होईल, त्यामुळे मी हे लेखन केले आहे, असे तो म्हणाला.ही तर कुराणची शिकवण लेखन करताना विरोध झाला नाही काय? यावर आबिद म्हणाला की, अनुवाद करण्यात कोणती अडचण येऊ शकते? असा प्रश्न मी अनेकांना केला होता. कोणत्याही किमतीत जातीय सलोखा राखला जावा, ही कुराणची शिकवण असल्याचेच माझ्या मनावर बिंबविण्यात आले. (वृत्तसंस्था)भगवद्गीता जगातील सर्वात मोठे साहित्यगेल्या वर्षी उर्दू कवी आणि लेखक अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील ७०० श्लोकांचे १७०० उर्दू दोह्यात रूपांतर केले होते. जगभरातील शिक्षणात गीता हे सर्वात मोठे साहित्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘उर्दू शायरी मे गीता’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. अन्वर यांनी केवळ श्लोकांचा उर्दू शेरांमध्ये अनुवादच केला नाही तर गीतेचा मूळ अर्थही मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णाचा उपदेश मी जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले होते.