शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

भगवद्गीतेनंतर हनुमान चालिसाही उर्दूत

By admin | Updated: August 11, 2015 13:55 IST

उत्तर प्रदेशातील आबिद अल्वी या युवकाने हनुमान चालिसेचा उर्दूत अनुवाद केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे उर्दू रूपांतर प्रकाशित करीत लक्ष वेधून घेतले होते

लखनौ : उत्तर प्रदेशातील आबिद अल्वी या युवकाने हनुमान चालिसेचा उर्दूत अनुवाद केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे उर्दू रूपांतर प्रकाशित करीत लक्ष वेधून घेतले होते.जौनपूर येथे राहणाऱ्या आबिदने आता शिव चालिसा प्रार्थनेच्या अनुवादाची योजना आखली आहे. अशा लेखनकार्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायातील लोकांना परस्परांची संस्कृती आणि श्रद्धा समजून घेण्यास मदत होईल. प्रत्येक बंधात सहा ओळी याप्रमाणे एकूण १५ बंधात हनुमान चालिसेचा अनुवाद केला आहे. मी मुसाददास यांच्याप्रमाणे सहा ओळीत भाषांतर केले. चारोळीप्रमाणे मुसाददास यांनी सहा ओळींची पद्धत आणली होती, असे त्याने सांगितले. विदेशी भाविकांमुळे कल्पना सुचली मी वाराणसीला भेट दिली तेव्हा काही विदेशी भाविकांनी लोकांना हनुमान चालिसा म्हणायला सांगितले होते. त्यामुळे माझ्या मनात अनुवादाची कल्पना आली. मी हिंदीचा विद्यार्थी असलो तरी हनुमान चालिसा उर्दूत आणण्याचे काम हाती घेतले. चुका टाळण्याची खबरदारी घेत मी अनुवाद केला. त्यासाठी मला तीन महिने लागले, अशी माहितीही त्याने दिली. उर्दूची पुस्तके हिंदीत आणि हिंदीची पुस्तके उर्दूत भाषांतरित करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. लोकांनी परस्परांना समजून घेतले तर बंधुभाव, ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट होण्यास मदत होईल, त्यामुळे मी हे लेखन केले आहे, असे तो म्हणाला.ही तर कुराणची शिकवण लेखन करताना विरोध झाला नाही काय? यावर आबिद म्हणाला की, अनुवाद करण्यात कोणती अडचण येऊ शकते? असा प्रश्न मी अनेकांना केला होता. कोणत्याही किमतीत जातीय सलोखा राखला जावा, ही कुराणची शिकवण असल्याचेच माझ्या मनावर बिंबविण्यात आले. (वृत्तसंस्था)भगवद्गीता जगातील सर्वात मोठे साहित्यगेल्या वर्षी उर्दू कवी आणि लेखक अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील ७०० श्लोकांचे १७०० उर्दू दोह्यात रूपांतर केले होते. जगभरातील शिक्षणात गीता हे सर्वात मोठे साहित्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘उर्दू शायरी मे गीता’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. अन्वर यांनी केवळ श्लोकांचा उर्दू शेरांमध्ये अनुवादच केला नाही तर गीतेचा मूळ अर्थही मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णाचा उपदेश मी जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले होते.