शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

हंसराज अहिर जोड

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

केंद्र सुरू करण्यासाठी पात्र ठरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सुरू करण्यासाठी पात्र ठरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राचे भूमिअधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच तयार करण्यात आले आहे. विरोधकांनी केलेल्या अनेक सूचनांचा समावेश सुधारित विधेयकात करण्यात आला आहे. त्यामुळे याला विरोधासाठी विरोध करू नये, असे अहिर म्हणाले. काँग्रेसला तर या विधेयकावर टीका करण्याचा अधिकारच नाही. कारण त्यांच्या सत्ताकाळात अनेक वर्षांपर्यंत ब्रिटिशकालीन कायद्यानुसारच अधिग्रहण केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेला संजय फांजे व अशोक धोटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट
लोकप्रतिनिधींनी सावध असावे
महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना सरपंचांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी सावध असावे, असा सल्ला हंसराज अहिर यांनी दिला. कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना न्यायालयाने बजावलेल्या समन्सकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. कोळसा घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांमध्ये अहिर यांचा समावेश होता, हे येथे उल्लेखनीय. न्यायालयाने ज्या दिवशी खाणपट्टे वाटप रद्द केले त्याच दिवशी आमचा विजय झाला होता. मोदी सरकारने आता पारदर्शक पद्धतीने लिलाव केल्याने सरकारच्या तिजोरीत दोन लाख कोटी रुपये जमा झाले. संबंधित राज्यांनाही याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र सरकारलाही दोन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे, असे अहिर म्हणाले.