शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

हॉटेलमध्ये आता फुल प्लेटऐवजी मिळणार हाफ प्लेट ?

By admin | Updated: April 12, 2017 08:42 IST

अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - ब-याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणतीही डिश फुल प्लेट घ्यावी लागते. एका व्यक्तीला ही फुल प्लेट डिश संपवणं जिवावर येतं. त्यामुळे उरलेलं अन्न टाकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. मात्र अन्नाची होणारी ही नासाडी टाळण्यासाठी आता केंद्र सरकार हॉटेलमध्ये फुल प्लेटच्या ऐवजी कोणतीही डिश हाफ प्लेटमध्ये देता येईल का, यावर विचार करत आहे. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना ग्राहकांना एका प्लेटमध्ये किती प्रमाणात अन्न मिळणार आहे, हेही आता हॉटेलमालकांना स्पष्ट करावं लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना यासंबंधी एक ताकीदच दिली आहे. हॉटेल मालक फुल प्लेटच्या डिशसोबतच हाफ प्लेट डिश देण्याची व्यवस्था करणार नसल्यास आम्ही यासाठी कायदेशीर तरतूर करण्याच्या तयारीत असल्याचं राम विलास पासवान म्हणाले आहेत. वैयक्तिक अनुभवांतून ही कल्पना आली आहे. जेव्हा आपण बाहेर खायला जातो, तेव्हा अन्नाची प्रचंड नासाडी होताना पाहतो. दुसरीकडे देशात असेही काही नागरिक आहेत, ज्यांना खायला अन्न मिळत नाही, असं पासवान यांनी सांगितलं आहे. देशात प्रमाणाच्या बाहेर अन्नाची नासाडी होत असते, गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून अन्नाच्या होणा-या नासाडीवर चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी ताटात गरजेपुरतं अन्न घ्या आणि घेतलेल्या अन्नाची नासाडी करू नका, असा सल्ला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर राम विलास पासवान यांनी हे मत व्यक्त केल्याचं बोललं जातंय. हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सनी किती अन्न सर्व्ह करावं, याबाबत सरकार कोणतीही नियमावली करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र तुम्ही एका प्लेटमध्ये किती चपात्या, किंवा इडल्या किंवा चिकनचे पिस देणार, याचा उल्लेख करा, अशी अपेक्षा हॉटेल्सकडून पासवान यांनी व्यक्त केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आता फुल प्लेट भाजी घेणं बंधनकारक नसल्याचे सूतोवाच पासवान यांनी केले होते. हाफ किंवा पाव प्लेट भाजी देण्याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयानं एक मसुदा तयार केला असून, त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी हाफ प्लेट भाजी देत नसल्यानं नाइलाजास्तव फुल प्लेट भाजी घ्यावी लागते. एका व्यक्तीला एवढी भाजी संपवणं अवघड जातं. तसेच तुम्हाला फुल प्लेटचे पैसेही मोजावे लागतात, याच पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयानं हे पाऊल उचलणार असल्याचं बोललं जात आहे.