शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मोदींच्या सभांमध्ये निम्मी कपात

By admin | Updated: October 15, 2015 23:39 IST

बिहार विधानसभा निवडणुकींमध्ये जास्तच गाजावाजा होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा अतिरेक विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो याची जाणीव झाल्याने भाजपश्रेष्ठींनी

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहार विधानसभा निवडणुकींमध्ये जास्तच गाजावाजा होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा अतिरेक विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो याची जाणीव झाल्याने भाजपश्रेष्ठींनी रॅलींची संख्या ४० वरून २० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी मोदी ५ टप्प्यांत १२ ते १४ रॅलींना संबोधित करणार होते, मात्र तेच एकमेव स्टार प्रचारक असल्यामुळे रॅलींचा आकडा फुगत ४० वर गेला.काट्याची लढत आणि भाजपच्या प्रतिष्ठेचा मुद्दा पाहता प्रचार चमूने कोणतीही कसर सोडायची नाही असे ठरवत प्रत्येक टप्प्यात मोदींच्या सहा ते सात रॅलींचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला होता. १२ आॅक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान संपताच पंतप्रधानांच्या सभा अतीच झाल्याचा प्रतिसाद मिळाला. आता त्यांनी उर्वरित टप्प्यात २ ते ३ पेक्षा जास्त प्रचारसभा घेऊ नये असा निर्णय झाल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.>> प्रत्येक मेगारॅलीसाठी गर्दी जमविण्याऐवजी कार्यकर्त्यांना दारोदार प्रचाराला अधिक वेळ देता यावा हेही अन्य कारण समोर आले आहे. भाजपने ४० प्रचारकांची यादी जारी केली असली तरी गृहमंत्री राजनाथसिंग आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याखेरीज कुणीही सभा घेतलेल्या नाहीत. शॉटगन शत्रुघ्न सिन्हा, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे नेते फिरकलेही नाहीत. मुख्यमंत्री मागासवर्गीयभाजपने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याचे टाळले असताना सुशीलकुमार मोदी, नंदकिशोर यादव यांची नावे चर्चेत आली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री गिरिराजसिंग यांनी मात्र मुख्यमंत्री मागासवर्गीय राहणार हे घोषित केले आहे. भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पत्रपरिषदेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रेमकुमार यांचे नाव समोर आणले. दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राजेंद्रसिंग आणि रामेश्वर चौरासिया यांची प्रशंसा करीत तर्कवितर्कांना वाव दिला आहे.