शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नेत्यांमागे 'हाजी हाजी' करणे पक्षाला घातक - काँग्रेस नेते

By admin | Updated: March 16, 2017 12:18 IST

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 16 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षामध्ये नेत्यांची हाजीहाजी करण्याची जी संस्कृती सुरु आहे त्यामुळे पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे काँग्रेसच्या दोन माजी केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती नेत्यांचा जो गोतावळा असतो त्यातून ते बाहेर पडले तरच, त्यांना योग्य मार्ग सापडेल असे माजी पंचायती राज मंत्री किशोर चंद्र देव यांनी सांगितले. 
 
मात्री केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, पक्षाने ज्या चुका केल्या आहेत त्या मान्य कराव्या आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. काँग्रेसला ऑटो इम्युन आजार झाला आहे. या आजारात आपलच शरीर आपल्या विरोधात काम करत तसचं काँग्रेसच झाल आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाने पुन्हा पक्षसंघटना बांधण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मुंबईच्या माजी काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांनी व्यक्त केले.
 
काँग्रेस मोठया प्रमाणावर ठराविक नेत्यांवर अवलंबून आहे. पण त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित होत नाही. या नेत्यांच्या व्यक्तीगत आवड आणि न आवडण्याची किंमत पक्षाला चुकवावी लागते. ते पक्षात महत्वाच्या पदांवर आहेत. या नेत्यांमध्ये संगीत खुर्ची चालते. त्यांच्यावर एका राज्य झाले कि, दुस-या राज्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या नेत्यांकडे जी राज्य दिली तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना सुद्धा हे माहित आहे असे काँग्रेस नेते किशोर चंद्र देव म्हणाले. राहुल गांधी यांच्या पलीकडे आता पक्षाने पाहण्याची गरज आहे का ? या प्रश्नावर अश्विनी कुमार म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेससमोर आज मोठे आव्हान असून,  सुधारणेसाठी जे आवश्यक आहे त्याचा विचार करावा.