शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नेत्यांमागे 'हाजी हाजी' करणे पक्षाला घातक - काँग्रेस नेते

By admin | Updated: March 16, 2017 12:18 IST

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 16 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षामध्ये नेत्यांची हाजीहाजी करण्याची जी संस्कृती सुरु आहे त्यामुळे पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे काँग्रेसच्या दोन माजी केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती नेत्यांचा जो गोतावळा असतो त्यातून ते बाहेर पडले तरच, त्यांना योग्य मार्ग सापडेल असे माजी पंचायती राज मंत्री किशोर चंद्र देव यांनी सांगितले. 
 
मात्री केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, पक्षाने ज्या चुका केल्या आहेत त्या मान्य कराव्या आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. काँग्रेसला ऑटो इम्युन आजार झाला आहे. या आजारात आपलच शरीर आपल्या विरोधात काम करत तसचं काँग्रेसच झाल आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाने पुन्हा पक्षसंघटना बांधण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मुंबईच्या माजी काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांनी व्यक्त केले.
 
काँग्रेस मोठया प्रमाणावर ठराविक नेत्यांवर अवलंबून आहे. पण त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित होत नाही. या नेत्यांच्या व्यक्तीगत आवड आणि न आवडण्याची किंमत पक्षाला चुकवावी लागते. ते पक्षात महत्वाच्या पदांवर आहेत. या नेत्यांमध्ये संगीत खुर्ची चालते. त्यांच्यावर एका राज्य झाले कि, दुस-या राज्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या नेत्यांकडे जी राज्य दिली तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना सुद्धा हे माहित आहे असे काँग्रेस नेते किशोर चंद्र देव म्हणाले. राहुल गांधी यांच्या पलीकडे आता पक्षाने पाहण्याची गरज आहे का ? या प्रश्नावर अश्विनी कुमार म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेससमोर आज मोठे आव्हान असून,  सुधारणेसाठी जे आवश्यक आहे त्याचा विचार करावा.