शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंनी चौकशांऐवजी शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा गुलाबराव पाटील : १३ रोजीचा मोर्चा निघणार, १० हजार शेतकर्‍यांचा सहभाग

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्‍यांनी केळी कर्ज घेतले ते आपल्या जमिनी तारण करून, त्यांनी खडसे यांच्यासारखे पॉलीहाऊसचे अनुदान घेतले नाही, असे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्‍यांनी केळी कर्ज घेतले ते आपल्या जमिनी तारण करून, त्यांनी खडसे यांच्यासारखे पॉलीहाऊसचे अनुदान घेतले नाही, असे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्‘ात शेतकरी त्राहीमाम करीत आहे. गिरणा प˜ा उजाड झाला. ज्या शेतकर्‍यांनी कसेबसे कर्ज भरले त्यांना विविध कार्यकारी सोसायट्यांकडून कर्ज अजूनही मिळालेले नाही. अनेक शेतकरी पैशांअभावी अडचणीत सापडले आहेत. आता कांदा उत्पादकही चुकीच्या शेती धोरणामुळे आत्महत्या करीत आहेत. यावल तालुक्यात किनगाव खुर्द येथे अशा कांदा उत्पादकाने चुकीच्या कृषि धोरणांवर बोट ठेवून आपले जीवन संपविले. पण कृषि विभाग, मंत्री या शेतकर्‍याकडे गेले का हा मुद्दा आहे. ज्या बळीराजाने यांना मोठं केलं त्या बळीराजाच्या कर्जांची चौकशी करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकर्‍यांना वेठीस धरण्याऐवजी दुष्काळी स्थितीत त्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा. अजून मागील हंगामाचे बागायती पिकांचे अनुदान आले नाही. यंत्रणा फक्त आपल्यापुरतीच राबविण्याचा प्रकार या स्थितीत करणे शेती व शेतकरी यांच्या हिताचे नाही. शेतकरी या प्रकाराचे उत्तर योग्य वेळ आल्यानंतर देतीलच. कितीही धमक्या आल्या तरी बळीराजासाठी माघार घेतली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेतर्फे बळीराजाच्या मागण्यांसाठी १३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यात १० हजारांवर शेतकरी सहभागी होतील, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.