शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

गुजरात विधानसभा निवडणुकीवर पाटीदार आरक्षण भारी पडणार

By admin | Updated: May 17, 2016 04:37 IST

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांना १० टक्के आरक्षणाची घोषणा करून हा मुद्दा थंड पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना अत्यल्प यश मिळण्याची चिन्हे आहेत.

अहमदाबाद : पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटीदारांची आरक्षणाची मागणी हा मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता असून, सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांना १० टक्के आरक्षणाची घोषणा करून हा मुद्दा थंड पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना अत्यल्प यश मिळण्याची चिन्हे आहेत. तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात पाटीदारांनी केलेल्या नऊ महिन्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले होते. त्यानंतर राज्य सरकारने अलीकडेच आरक्षणाची घोषणा करून या समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटीदार अनामत आंदोलन समितीने सरकारचा तोडगा फेटाळून लावला. यापूर्वी राज्य सरकारने पटेल आरक्षण आंदोलनाच्या प्रत्युत्तरात सवर्णांमधील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीकरिता ‘मुख्यमंत्री युवा स्वावलंबन योजना’ जाहीर केली होती. अर्थात सरकारचा हा प्रयत्नही अपयशी ठरला. काँग्रेसने सरकारचे हे पाऊल म्हणजे पाटीदारांना दाखविण्यात आलेले लॉलीपॉप असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत पक्षाची सत्ता आल्यास ईबीसीचे आरक्षण वाढवून २० टक्के करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेस २५ वर्षांपासून सत्तेबाहेरपटेल आरक्षण आंदोलनानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत प्रथमच विजय मिळविणारी काँग्रेस २५ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेबाहेर आहे, पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याची अपेक्षा तिला आहे. गुजरातच्या राजकारणात नरेंद्र मोदींसारख्या दिग्गज नेत्यांची उणीव आणि आरक्षण आंदोलनासारख्या मुद्द्यामुळे भाजपाला २०१७च्या विधानसभा निवडणुकीत आपली बाजू बळकट ठेवण्यास अडचणी येत आहेत. ।गुजरात काँग्रेसचे महासचिव निशीत व्यास यांनी सांगितले की, निवडणुकीवर आरक्षण मुद्द्याचा प्रभाव असेल. त्यांची मागणी योग्य आहे. सवर्णांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा फार विलंबाने झाली असून, ते अत्यल्प आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास ईबीसींना २० टक्के आरक्षण देण्यात येईल. १० टक्के आरक्षणाचा निर्णय पटेल समुदायाने व्यापकपणे स्वीकारला असून, केवळ काही सदस्यांना हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे, असा दावा भाजपाने केला. भाजपाचे प्रवक्ते हर्षद पटेल म्हणाले की, पाटीदार अनामत आंदोलन समितीतील काही काँग्रेसचा पाठिंबा असलेले सदस्य आमच्या घोषणेला विरोध करीत आहेत.