शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

अमरनाथसाठी १४ हजार जवानांचा पहारा

By admin | Updated: May 16, 2017 01:46 IST

काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. संपूर्ण यात्रेच्या मार्गावर लष्कर, निमलष्करी दले आणि स्थानिक पोलिसांचे १४ हजार जवान डोळ्यात तेल घालून यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी वाहणार आहेत. ३०० कि.मी.च्या यात्रा मार्गावर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट सुरक्षा जवान तैनात असतील. ही यात्रा २९ जून ते ७ आॅगस्ट अशी व्हायची आहे. यात्रेला देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेचा बराचसा भाग दक्षिण काश्मीरमधून जातो. याच भागात दगडफेक आणि सुरक्षा दलांवर हल्ले होत असल्यामुळे यात्रेबाबत काहीशी चिंता निर्माण झाली असली तरी यात्रा निर्विघ्न व्हावी यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांनी कंबर कसली आहे. मार्गावरील संवेदनशील भागात दोन बटालियन तैनात करण्याचे लष्कराचे नियोजन आहे. एका बटालियनमध्ये एक हजार सैनिक असतात. याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांनी १०० हून अधिक कंपन्या तैनात करणार आहेत. (एका कंपनीत १०० जवानांचा समावेश असतो.) गेल्यावर्षी याच्या निम्म्याच कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.