शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरनाथसाठी १४ हजार जवानांचा पहारा

By admin | Updated: May 16, 2017 01:46 IST

काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. संपूर्ण यात्रेच्या मार्गावर लष्कर, निमलष्करी दले आणि स्थानिक पोलिसांचे १४ हजार जवान डोळ्यात तेल घालून यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी वाहणार आहेत. ३०० कि.मी.च्या यात्रा मार्गावर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट सुरक्षा जवान तैनात असतील. ही यात्रा २९ जून ते ७ आॅगस्ट अशी व्हायची आहे. यात्रेला देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेचा बराचसा भाग दक्षिण काश्मीरमधून जातो. याच भागात दगडफेक आणि सुरक्षा दलांवर हल्ले होत असल्यामुळे यात्रेबाबत काहीशी चिंता निर्माण झाली असली तरी यात्रा निर्विघ्न व्हावी यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांनी कंबर कसली आहे. मार्गावरील संवेदनशील भागात दोन बटालियन तैनात करण्याचे लष्कराचे नियोजन आहे. एका बटालियनमध्ये एक हजार सैनिक असतात. याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांनी १०० हून अधिक कंपन्या तैनात करणार आहेत. (एका कंपनीत १०० जवानांचा समावेश असतो.) गेल्यावर्षी याच्या निम्म्याच कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.