शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जीएसटीचा दर सामान्यांना परवडणारा असावा

By admin | Updated: August 4, 2016 04:04 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विधेयकाच्या मसुद्यावर प्रश्नचिन्ह लावले.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विधेयकाच्या मसुद्यावर प्रश्नचिन्ह लावले. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून दर निश्चित करण्याची मागणी करताना काँग्रेसने या विधेयकाला कधीही विरोध केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जीएसटीला मनी विधेयक म्हणून नाही तर वित्त विधेयक म्हणून सादर केले जाईल, अशी हमी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्यायला हवी, असे चिदंबरम यांनी बुधवारी राज्यसभेत म्हटले. या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते मनी विधेयक या स्वरूपात सादर केले जाऊ नये, असेही त्यांनी जोर देऊन सांगितले. लोक महागाईच्या ओझ्याखाली दबू नयेत यासाठी या कराचा सामान्य दर १८ टक्क्यांहून कमी ठेवावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. अधिक उत्पन्न असलेल्या देशांत चुकता करण्यात येणाऱ्या अप्रत्यक्ष कराची सरासरी १६.४ टक्के, तर भारतासारख्या विकसनशिल देशांत १४.१ टक्के आहे. प्रत्यक्ष कराचा महसूल नेहमीच अप्रत्यक्ष कराहून अधिक असायला हवा, असेही त्यांनी म्हटले.संजय राऊत यांचा आरोपचर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे संजय राऊत यांनी केंद्र सरकार मुंबई महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडायला निघाल्याचा आरोप केला. वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) मुंबईचे चार प्रमुख तपासणी नाके बंद होतील. हे केवळ मुंबईसाठीच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही धोक्याचे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेचा तपासणी नाका महसुलाचा सर्वात मोठा मार्ग असून, त्याद्वारे वार्षिक ७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर गोळा होतो. त्यातून अनेक सुविधा पुरविल्या जातात. मुंबईला कमकुवत करणे घातक ठरेल. मुंबईने देशाला नेहमीच दिले आहे. एकूण आयकराचा ३० टक्के भाग, ६० टक्के अबकारी कर, २० टक्के केंद्रीय उत्पादन शुल्क, ४० टक्के परदेश व्यापार कर आणि ४० हजार कोटींचा कॉर्पोरेट कर केंद्राला मुंबईकडून मिळतो.अण्णा द्रमुकचा विरोधजीएसटी विधेयकामुळे भारताच्या संघराज्य व्यवस्थेचेच उल्लंघन होत आहे. हे विधेयक घटनेच्या कलम २१ च्या विरोधात आहे, असा आरोप अद्रमुकने राज्यसभेत केला. अद्रमुकचे नवनीत कृष्णन म्हणाले की, या विधेयकाने तामिळनाडूला कायमस्वरूपी आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. घटनेच्या कलम २१ चे जीएसटीमुळे उल्लंघन होत आहे. जीएसटीची कर पद्धती स्थलाधिष्ठित आहे. वस्तूंच्या जेथे निर्माण होतात, तेथे कर लावताच येत नाही. त्यामुळे तामिळनाडूला ९,२७0 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.>काळा पैसा विधेयकाचे काय झाले : सपासमाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल म्हणाले की, देशाच्या प्रगतीत अडथळा ठरत असल्याचा दोष आमच्यावर येऊ नये, यासाठी आम्ही जीएसटीला पाठिंबा दिला आहे. राओला सरकार प्रत्येक विधेयक आणताना असा आव आणते की, जणू संपूर्ण देशच आता बदलून जाणार आहे; पण तसे काही होताना दिसत नाही. तुम्ही असाच गाजावाजा करून काळ्या पैशाचे विधेयक आणले. त्याचे काय झाले? महागाई वाढेल, असे काही करू नका. १0 लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना जीएसटीमधून वगळायला हवे.