शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जीएसटी; काँग्रेससह विरोधकांचा सशर्त पाठिंबा

By admin | Updated: August 26, 2015 03:50 IST

सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पाडण्याची जय्यत तयारी चालविली असताना काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीसरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पाडण्याची जय्यत तयारी चालविली असताना काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी कोणतेही ठोस आश्वासन देण्याचे टाळत सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य केल्या तरच सहकार्य या शब्दांत सशर्त समर्थनाचे संकेत दिले आहे. काँग्रेसने ठोस पाठिंबा न दिल्याने सरकारने विरोधकांशी सल्लामसलतीच्या प्रक्रियेला वेग दिला असला तरी अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाबाबत संभ्रमाची स्थिती आहे.महत्त्वपूर्ण जीएसटी विधेयक संमत करण्यासाठी मोदी सरकारने संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना कामाला लावले आहे. या मंत्र्यांनी घरी चकरा मारूनही विरोधी पक्षनेत्यांनी भीक घातलेली नाही. नायडूंनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुचविलेल्या सुधारणा मान्य करा तरच समर्थन मिळेल या शब्दांत खरगे यांनी त्यांना सुनावले. डावे पक्ष, समाजवादी पक्ष, टीएमसीनेही विधेयकावर सहमती झाली तरच साथ देण्याची भाषा केली आहे. सरकारची स्थिती ‘न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी’ अशी झाली आहे. विरोधी बाकावर असताना ज्या मुद्यांना विरोध चालविला होता, त्याच काँग्रेसच्या अटी स्वीकाराव्या लागणार अशा खिंडीत भाजप सापडला आहे.संयुक्त अधिवेशन अशक्यचघटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे संयुक्त अधिवेशन बोलावत संख्याबळाच्या आधारावर विधेयक संमत करवून घेण्याचा मार्ग सरकारला अवलंबता येणार नाही. त्यामुळेच जेटली,नायडू, मुख्तार अब्बास नकवी यांच्यासारख्या नेत्यांना विरोधकांकडे हात पसरावे लागत आहे. नायडूंचे आवाहनसरकारने अधिवेशन बोलावण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत चालविली असल्याचे नायडू यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. नायडूंनी मंगळवारी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन संसदेत सहकार्य देण्याची विनंती केली. जीएसटी, स्थावर मालमत्ता नियमन आणि भूसंपादन ही तिन्ही विधेयके महत्त्वाची असून ती संमत होण्यात विलंब होणे म्हणजे देशाच्या इच्छाआकांक्षेला विशेषत: नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या युवकांच्या स्वप्नांना हादरा देणारे ठरेल तसेच विकासाचा वेग मंदावण्याची जोखीम उद्भवेल. हे विधेयक संमत झाल्यास देशाच्या विकासदरात (जीडीपी) १.५ ते २ टक्क्यांची भर पडेल, असे त्यांनी मुडीसारख्या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेच्या अभ्यासाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.