शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

स्मार्ट शहराच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा ग्रीहा परिषद समारोप : गिरीश महाजन यांची अपेक्षा

By admin | Updated: December 5, 2015 23:51 IST

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.

जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्‍यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे आयोजित परिषदेत व्यक्त केली.
सातव्या प्रादेशिक ग्रीहा परिषदेचा शनिवारी येथील जैन हिल्सवर समारोप झाला. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आमदार किशोर पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अनीश शाह, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले प्रत्येकाने पाण्याचा जबाबदारीने वापर केला पाहीजे. शहरांमध्ये ३५ टक्के पाण्याची गळती होते. त्याही समस्येचा सामना आपल्याला करावयाचा आहे. शहरातील सांडपाण्यावर भविष्यात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचे संकट आपल्यापुढे आहे. जैन इरिगेशचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी देशाच्या शाश्वत विकासासाठी शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीय करण्याची गरज बोलून दाखविली. देशातील ६० टक्के लोक खेड्यात रहात असून शहरेसुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शहरांसोबत खेड्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीय करायला पाहीजे. जोपर्यंत मने आणि विचार स्मार्ट होणार नाहीत, तोपर्यंत स्मार्ट शहरे निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले.
विकासाची नांदी
स्मार्ट शहरांसंदर्भातील परिषद म्हणजे शहरासाठी भविष्यातल्या विकासाची नांदी असून शहर विकासासाठी आपण पुढाकार घेऊ असे मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले. भरत अमळकर यांचेही भाषण झाले. प्राचार्या वर्षा चोरडिया यांनी सूत्रसंचालन तर पूर्वा केसकर यांनी आभार मानले.
-----
फोटो कॅप्शन
ग्रीहा परिषद समारोप सत्रात बोलताना गिरीश महाजन. सोबत व्यासपीठावर अनीश शाह, भरत अमळकर, संजय कापडणीस, अतुल जैन, आमदार किशोर पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूर्वा केसकर.
फोटो नंबर ०६सीटीआर ५६ व ५७