शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकही गाव आदर्श दिसलेे नाही ग्राम स्वच्छता पाहणी समितीचे मत : ४० गावांचे गुणांकन करून जि.प. सीईओंना अहवाल सादर; हगणदरींचा प्रश्न

By admin | Updated: October 30, 2015 23:56 IST

सोबत फोटो-

सोबत फोटो-

जळगाव- जिल्ह्यातील कमाल भाग सधन आहे. पण शौचालयांबाबत स्थिती फारशी बरी नाही. हगणदरींचा प्रश्न आहे. जिल्ह्यात एकही आदर्श गाव (मॉडल व्हीलेज) आम्हाला पाहणीदरम्यान दिसले नाही. काही गावांमध्ये शाळांची स्वच्छता, दलित वस्तींची कामे चांगली आहेत, असे मत जिल्ह्यात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणीसाठी सातारा येथून आलेल्या समितीचे प्रमुख तथा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.
या समितीने बुधवार व गुरुवारी जिल्ह्यात ४० गावांची संत गाडगेबाबात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणी केली. या गावांची पाहणी करून समितीने गुणांकन केले व आपला अहवाल सीईओंना सादर केला. या पाहणीसंबंधी समितीने वार्तालाप केला. या वेळी सातारा जि.प.चे सीईओ नितीन पाटील, खंडाळा, जि.सातारा पं.स.चे सभापती रमेश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, पत्रकार प्रवीण शिंगटे आदी १५ सदस्य उपस्थित होते.

सातारा खूप पुढे
शौचालयांच्या लक्ष्यांकात सातारा जिल्हा पुढे आहे. तसे जळगाव जिल्ह्यात दिसले नाही. सातारा जिल्‘ात ९३ टक्के काम झाले आहे. जळगावात ५० टक्के काम राहीले आहे. यासंदर्भात लोकसहभाग वाढायला हवा, शौचालये वापरासंबंधी ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी, असे मत सोनवलकरांनी व्यक्त केले.

कमानीवर ग्रा.पं.ची संकल्पना सातार्‍यात राबविणार
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती गावाच्या दर्शनी भागात भली मोठी कमान बांधून त्यावर उभारल्या आहेत. जागा नसली तर ग्रा.पं.उभारण्याची ही संकल्पना उपयोगात येते. ही संकल्पना सातारा येथे राबवू, असे सोनवलकर म्हणाले.

काँक्रीटीकर, भुयारी गटारींचे काम चांगले
आमच्या तीन गटांनी पाहणी केली. त्यात दलित वस्ती व गावात इतरत्र बांधलेले सिमेेंटचे रस्ते चांगले आहे. भुयारी गटारी व प्राथमिक शाळांची स्थितीही चांगली आहे. पण शाळांमध्ये शौचालयांचा वापर होत नाही, असे जाणवले.

सीईओंकडून सीईओंची स्तुती
सीईओ नितीन पाटील म्हणाले, जळगावच्या सीईओंची भेट झाली. त्यांनी स्वच्छतेसंबंधी चांगला कार्यक्रम आखला आहे. काम हाती घेतले आहे. ते दिसेल. पण ग्रामस्थांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

वित्त आयोगातून जि.प.लाही निधी द्यावा
पंचायत राज व्यवस्थेत जि.प. महत्त्वाची आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी जि.प.लाही मिळावा, असे सोनवलकर म्हणाले.