शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?

By admin | Updated: August 2, 2016 23:46 IST

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
माजी खासदार वाय.जी.महाजन अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतीला गावातील समस्यांबाबत महिनाभरापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र प्रमुख समस्या कायमच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्यांची डागडुजी केली की थ˜ा मस्करी मांडली असल्याचे सांगून गावातील विविध समस्यांबाबत उहापोह झाला. पावसाळ्यात आठवडा उलटूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबत ताशेरे ओढले.
समितीच्या कार्याला राजकारणाचा रंग चढत असून दिशा भरकटत असल्याचा आक्षेप प्रा.अरुण पाटील यांनी घेतला. बैठकीला स्मार्ट समितीचे सदस्यच उदासीन आहे. त्यांची उपस्थिती नसल्याबाबतही त्यांनी उहापोह केला.
ग्रामविकास व्हावा हीच माझी तळमळ आहे. सत्ताधार्‍यांनी खुर्चीची लाज ठेवा. नीतीमत्ता शाबूत ठेवा. जनतेचे कामे करा, कुणावर आरोप करावा हा माझा हेतू नाही; पण नियोजन करा. ग्रामविकास साधा, एकत्र या असे आवाहन माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी केले.
बैठकीला स्मार्ट समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, दगडू माळी, बंडू रत्नपारखे, बी.आर.खंडारे, रत्नाकर पांढारकर, शे.रियाज, प्रा.अरुण पाटील, पंकज तारकस, उदय चौधरी, बापू चौधरी, बबन वाणी, संजय पाटील, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.