शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

देशभरात कोरोना लस पोहोचवण्याची जय्यत तयारी; प्रवासी विमानांना वाहतुकीची परवानगी

By देवेश फडके | Updated: January 7, 2021 17:19 IST

संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार असून, यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देदेशातील ४१ ठिकाणी कोरोना लस पोहोचवण्यात येणारकोरोना लसीच्या वाहतुकीसाठी प्रवासी विमानांना परवानगीः सरकारी सूत्रांची माहितीकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा

नवी दिल्ली : कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. ८ जानेवारी २०२० रोजी देशभरातील संपूर्ण ३३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेतली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (गुरुवारी) दिली. 

संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे. सर्व ठिकाणी आज किंवा उद्या कोरोना लस पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. पुणे प्रमुख केंद्र करण्यात आले असून, येथूनच संपूर्ण देशभरात कोरोना लसीचा पुरवठा केला जाणार आहे. देशभरात एकूण ४१ ठिकाणे निर्धारित करण्यात आली असून, तेथे कोरोना लस पोहोचवण्याचे काम निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

उत्तर भारतासाठी दिल्ली आणि करनाल मध्यवर्ती केंद्रे असतील. तर पूर्व भारतासाठी कोलकाता मुख्य केंद्र असेल. ईशान्य भारतात कोलकाता येथूनच लसींचा पुरवठा केला जाणार आहे. दक्षिण भारतासाठी चेन्नई आणि हैदराबाद मुख्य केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे, असेही सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यापूर्वी झालेल्या रंगीत तालमीनंतर आलेल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात ८ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरणाची पुन्हा एकदा रंगीत तालीम घेण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. 

महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संदर्भात सावधगिरी बाळगण्याची अद्यापही अधिक प्रमाणात आवश्यकता आहे, हा त्यामागील इशारा आहे. सर्वांनी कोरोनाविरोधातील लढा कायम ठेवावा. अधिकाधिक सावधगिरी बाळगून कार्यरत राहावे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवागनी देण्यात आली असून, शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार