शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ममतांना धमकी दिल्याचा आरोप राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठींनी फेटाळला

By admin | Updated: July 4, 2017 21:16 IST

ममतांचा हा आरोप राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 4 - पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी फोनवरून धमकी देत अपमान केल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला होता. मात्र ममतांचा हा आरोप राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी फेटाळून लावला आहे. राजभवनातून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. या पत्रकात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत कोणतंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचा खुलासा केला आहे.ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, भाजपाच्या एखाद्या ब्लॉक अध्यक्षाने बोलावे अशा भाषेत बोलून राज्यपालांनी जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे. उभ्या आयुष्यात अशा पद्धतीने कोणी मला अपमानित केले नव्हते. राज्यपाल ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते ऐकून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा विचारही माझ्या मनात डोकावून गेला.राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर आपण तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसेच त्रिपाठी यांनाही खडे बोल सुनावल्याचंही बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ममता म्हणाल्या, मी तुमच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झाले नाही, मला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आपण घटनात्मक पदावर असलात तरी मुख्यमंत्र्यांशी अशा भाषेत बोलू शकत नाही, असंही मी त्यांना सुनावले आहे.