शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम
पाटणा : जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत बिहारमधील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारला संकट आणि राजकीय अस्थिरतेत ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी भाजपच्या निर्देशावरून मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला आहे, असा आरोप जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला.
मुख्यमंत्री मांझी हे एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय घोषणा करीत असल्याने राज्यात अराजक आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आपण औटघटकेचे मुख्यमंत्री आहोत, हे ठाऊक असतानाही मांझी अनेक घोषणा करीत आहेत. राज्यपालांनी त्यांना अशा घोषणा करण्यापासून रोखले पाहिजे, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
-------
मांझी बहुमत सिद्ध करणारच -यादव
मांझी यांना जदयूच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते २० फेब्रुवारीलाआपले बहुमत सिद्ध करतील, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचे बंधू आणि माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, माजी मंत्री विजयकुमार चौधरी यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करून नितीशकुमार यांनी एक प्रकारे आपला पराभव स्वीकार केला आहे आणि मांझी यांना मुख्यमंत्री मानलेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याच पक्षाच्या चौधरी यांना पुढे केल्यामुळे नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी जदयूचे बंडखोर आमदार रवींद्र राय हे साधू यादव यांच्या सोबत होते.