शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम
पाटणा : जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत बिहारमधील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारला संकट आणि राजकीय अस्थिरतेत ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी भाजपच्या निर्देशावरून मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला आहे, असा आरोप जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला.
मुख्यमंत्री मांझी हे एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय घोषणा करीत असल्याने राज्यात अराजक आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आपण औटघटकेचे मुख्यमंत्री आहोत, हे ठाऊक असतानाही मांझी अनेक घोषणा करीत आहेत. राज्यपालांनी त्यांना अशा घोषणा करण्यापासून रोखले पाहिजे, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
-------
मांझी बहुमत सिद्ध करणारच -यादव
मांझी यांना जदयूच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते २० फेब्रुवारीलाआपले बहुमत सिद्ध करतील, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचे बंधू आणि माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, माजी मंत्री विजयकुमार चौधरी यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करून नितीशकुमार यांनी एक प्रकारे आपला पराभव स्वीकार केला आहे आणि मांझी यांना मुख्यमंत्री मानलेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याच पक्षाच्या चौधरी यांना पुढे केल्यामुळे नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी जदयूचे बंडखोर आमदार रवींद्र राय हे साधू यादव यांच्या सोबत होते.