शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम
पाटणा : जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत बिहारमधील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारला संकट आणि राजकीय अस्थिरतेत ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी भाजपच्या निर्देशावरून मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला आहे, असा आरोप जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला.
मुख्यमंत्री मांझी हे एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय घोषणा करीत असल्याने राज्यात अराजक आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आपण औटघटकेचे मुख्यमंत्री आहोत, हे ठाऊक असतानाही मांझी अनेक घोषणा करीत आहेत. राज्यपालांनी त्यांना अशा घोषणा करण्यापासून रोखले पाहिजे, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
-------
मांझी बहुमत सिद्ध करणारच -यादव
मांझी यांना जदयूच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते २० फेब्रुवारीलाआपले बहुमत सिद्ध करतील, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचे बंधू आणि माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, माजी मंत्री विजयकुमार चौधरी यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करून नितीशकुमार यांनी एक प्रकारे आपला पराभव स्वीकार केला आहे आणि मांझी यांना मुख्यमंत्री मानलेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याच पक्षाच्या चौधरी यांना पुढे केल्यामुळे नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी जदयूचे बंडखोर आमदार रवींद्र राय हे साधू यादव यांच्या सोबत होते.