शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विधानाने देशाची प्रतिमा मलिन

By admin | Updated: May 7, 2015 01:31 IST

दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहीत नाही, हे सरकारने लोकसभेत दिलेले स्पष्टीकरण नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरले आहे. काँग्रेसने बुधवारी या निमित्ताने राज्यसभेत सरकारवर जोरदार तोफ डागली. दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला. अन्य विरोधी पक्षांनीही यास दुजोरा देत, यासंदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली.राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उचलून धरला. दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे, यावर आधीचे सरकार कायम राहिले. गत २०-२२ वर्षांत मग ते अटल बिहारी वाजपेयी सरकार असो वा कॉंग्रेस सरकार असो. दाऊद पाकिस्तानात असल्याचे या सरकारांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून ठणकावून सांगितले आहे. असे असतानाच, दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सरकारने सांगणे हे दु:खद आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे, असे आझाद म्हणाले. माकपाचे सीताराम येचुरी यांनीही आझाद यांना दुजोरा दिला आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सभागृहाची भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. दाऊद भारताचा गुन्हेगार आहे. तो पाकिस्तानात आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)गृहमंत्र्यांच्या माहितीत तफावत> मंगळवारी लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरादाखल गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले होते. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. > तो कुठे आहे हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले होते. भारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. > दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती> त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता.