शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

सरकारच्या विधानाने देशाची प्रतिमा मलिन

By admin | Updated: May 7, 2015 01:31 IST

दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहीत नाही, हे सरकारने लोकसभेत दिलेले स्पष्टीकरण नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरले आहे. काँग्रेसने बुधवारी या निमित्ताने राज्यसभेत सरकारवर जोरदार तोफ डागली. दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला. अन्य विरोधी पक्षांनीही यास दुजोरा देत, यासंदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली.राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उचलून धरला. दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे, यावर आधीचे सरकार कायम राहिले. गत २०-२२ वर्षांत मग ते अटल बिहारी वाजपेयी सरकार असो वा कॉंग्रेस सरकार असो. दाऊद पाकिस्तानात असल्याचे या सरकारांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून ठणकावून सांगितले आहे. असे असतानाच, दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सरकारने सांगणे हे दु:खद आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे, असे आझाद म्हणाले. माकपाचे सीताराम येचुरी यांनीही आझाद यांना दुजोरा दिला आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सभागृहाची भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. दाऊद भारताचा गुन्हेगार आहे. तो पाकिस्तानात आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)गृहमंत्र्यांच्या माहितीत तफावत> मंगळवारी लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरादाखल गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले होते. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. > तो कुठे आहे हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले होते. भारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. > दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती> त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता.