शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

गरिबांचे सबलीकरण ही सरकारची उपलब्धी

By admin | Updated: May 27, 2016 04:04 IST

केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण

नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण, गरिबी निर्मूलनासाठी बँक खात्यात थेट हस्तांतरण, पंतप्रधान जनधन योजना, कौशल्य विकास, उज्ज्वला योजना, दीनदयाल उपाध्याय अंत्योदय आणि ग्राम ज्योती योजना, जन सुरक्षा, पंतप्रधान घरकुल योजना, ग्राम सडक आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भाजपातर्फे गुरुवारी ‘गरिबांचे सबलीकरण’ असा मथळा असलेले पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाल्याने आमचे सरकार गरिबांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवायही अनेक दावे यात करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गरिबांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने शून्य रकमेची खाती उघडण्यात आली. याअंतर्गत २१.८१ कोटी खाती उघडण्यात आली असून त्यात ३७,६१६ कोटी रुपये जमा झाले आहेत. दलाल आणि इतर मध्यस्थांना बाजूला सारून योग्य लाभार्र्थींपर्यंत लवकरात लवकर लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा अनेक उपाययोजना अमलात आल्या आहेत, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. पुस्तकातील दावे दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत स्वातंत्र्यापासून अंधारात असलेल्या गावखेड्यांपर्यंत वीज पोहोचवून तेथील लोकांचे जीवन बदलण्याची योजना आहे. याअंतर्गत 1000 दिवसात १८,५०० गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे लक्ष्य असून २०१५-१६ मध्ये ७,१०८ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. कौशल्य विकासाच्या पुढाकाराने तरुणांना भविष्याची नवी दिशा मिळाली आहे. गावखेड्यांमधील गरिबी दूर करण्यासाठी प्रशिक्षणानंतर थेट रोजगाराचा प्रयत्न. दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ३ लाख ५६ हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात आले. उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन देऊन धुरापासून मुक्तता. गरिबांसाठी नवीन आरोग्य विमा तर ज्येष्ठांना अतिरिक्त विमा पॅकेजचे कवच. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी २०२२ पर्यंत दोन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तर ग्रामीण गरिबांसाठी २०१९ पर्यंत १.२० लाख रुपये खर्चाची एक कोटी घरे बांधणार आणि या सर्व घरांमध्ये शौचालये असतील. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत प्रत्येक गाव रस्त्याला जोडले जाईल. अंत्योदय योजनेअंतर्गत ८.९ कोटी गरिबांच्या घरांपर्यंत पोहोचणार स्वच्छ भारत अभियान ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असून याअंतर्गत भारताला स्वच्छ करण्यास पुढाकार घेण्यात आला आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी तरुणांना प्रत्येकी २५,६९६ रुपयांपासून १,२२,३६२ रुपयांपर्यंत आर्थिक मदत.