शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे सबलीकरण ही सरकारची उपलब्धी

By admin | Updated: May 27, 2016 04:04 IST

केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण

नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण, गरिबी निर्मूलनासाठी बँक खात्यात थेट हस्तांतरण, पंतप्रधान जनधन योजना, कौशल्य विकास, उज्ज्वला योजना, दीनदयाल उपाध्याय अंत्योदय आणि ग्राम ज्योती योजना, जन सुरक्षा, पंतप्रधान घरकुल योजना, ग्राम सडक आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भाजपातर्फे गुरुवारी ‘गरिबांचे सबलीकरण’ असा मथळा असलेले पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाल्याने आमचे सरकार गरिबांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवायही अनेक दावे यात करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गरिबांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने शून्य रकमेची खाती उघडण्यात आली. याअंतर्गत २१.८१ कोटी खाती उघडण्यात आली असून त्यात ३७,६१६ कोटी रुपये जमा झाले आहेत. दलाल आणि इतर मध्यस्थांना बाजूला सारून योग्य लाभार्र्थींपर्यंत लवकरात लवकर लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा अनेक उपाययोजना अमलात आल्या आहेत, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. पुस्तकातील दावे दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत स्वातंत्र्यापासून अंधारात असलेल्या गावखेड्यांपर्यंत वीज पोहोचवून तेथील लोकांचे जीवन बदलण्याची योजना आहे. याअंतर्गत 1000 दिवसात १८,५०० गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे लक्ष्य असून २०१५-१६ मध्ये ७,१०८ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. कौशल्य विकासाच्या पुढाकाराने तरुणांना भविष्याची नवी दिशा मिळाली आहे. गावखेड्यांमधील गरिबी दूर करण्यासाठी प्रशिक्षणानंतर थेट रोजगाराचा प्रयत्न. दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ३ लाख ५६ हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात आले. उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन देऊन धुरापासून मुक्तता. गरिबांसाठी नवीन आरोग्य विमा तर ज्येष्ठांना अतिरिक्त विमा पॅकेजचे कवच. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी २०२२ पर्यंत दोन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तर ग्रामीण गरिबांसाठी २०१९ पर्यंत १.२० लाख रुपये खर्चाची एक कोटी घरे बांधणार आणि या सर्व घरांमध्ये शौचालये असतील. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत प्रत्येक गाव रस्त्याला जोडले जाईल. अंत्योदय योजनेअंतर्गत ८.९ कोटी गरिबांच्या घरांपर्यंत पोहोचणार स्वच्छ भारत अभियान ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असून याअंतर्गत भारताला स्वच्छ करण्यास पुढाकार घेण्यात आला आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी तरुणांना प्रत्येकी २५,६९६ रुपयांपासून १,२२,३६२ रुपयांपर्यंत आर्थिक मदत.