शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

नोकरशहांच्या मनमानी बदलीने सरकार चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2015 23:26 IST

नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या

नवी दिल्ली : नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांचा सविस्तर अहवाल मागितला आहे.अधिकृत सूत्रांनी मंगळवारी येथे दिलेल्या माहितीनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी)अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदल्यांचा निर्णय घेणाऱ्या नागरी सेवा मंडळाच्या (सीएसबी) स्थापनेबाबतही माहिती मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डीओपीटीने यापूर्वी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (कॅडर)नियमावलीत दुरुस्ती करून सर्व कॅडरच्या पदांकरिता किमान दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. नियमानुसार सीएसबीने केंद्र सरकारच्या ठराविक अर्जात त्रैमासिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यात किमान कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती आणि बदलीचे कारणही स्पष्ट करायचे आहे. सीएसबीच्या स्थापनेबाबतची सविस्तर माहिती व त्रैमासिक अहवाल सादर करण्याची विनंती पुन्हा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना करण्यात येत आहे.