शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यातील उपक्रमांची सरकार विक्री करणार

By admin | Updated: April 25, 2016 03:58 IST

सरकारी खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने सरकार तोट्यातील काही उपक्रमांच्या विक्रीचा विचार करीत आहे.

नवी दिल्ली : सरकारी खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने सरकार तोट्यातील काही उपक्रमांच्या विक्रीचा विचार करीत आहे. या काळात या उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण केले जाईल आणि त्यांना ‘आकर्षक’ भरपाई देण्याचा प्रस्ताव दिला जाईल. सूत्रांनी सांगितले की, खर्च व्यवस्थापन आयोगाच्या शिफारशीनुसार काही तोट्यातील सरकारी उपक्रमांच्या विक्रीचा विचार केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताला नुकसान होणार नाही या दृष्टीने हे काम केले जाईल. सरकार आणि कर्मचारी या दोघांनाही फायदा व्हावा या दृष्टीने हे काम केले जाणार आहे. तोट्यातील उपक्रमांची यादी सरकारने अगोदरच तयार केली असून या उपक्रमातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची रक्कम एकदाच देण्याची पेशकश केली जाऊ शकते. सरकारच्या ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षी मार्च अखेरीसपर्यंत ७७ तोट्यातील उपक्रम होते. या सर्व उपक्रमांचा तोटा २७,३६० कोटी रुपये होता. भारत गोल्ड माईन्स, टॅनरी अ‍ॅण्ड फुटवियर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, सायकल कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, मायनिंग अ‍ॅण्ड अलाईड मशिनरी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, भारत प्रोसेस अ‍ॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्स, वेबर्ड इंडिया आणि भारत ब्रेक्स अ‍ॅण्ड व्हॉल्व्हस् आदींचा तोट्यातील उपक्रमात समावेश आहे.>उत्पन्न वाढविण्यावर एअर इंडियाचा भरबाजारातील कठीण परिस्थिती आणि वित्तीय अडचणी असूनही एअर इंडिया ही सरकारी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्याऐवजी उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.एअर इंडियात जवळपास १९ हजार कर्मचारी असून त्यात १५०० वैमानिक आहेत. ६ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. कंपनीला ३० हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज मिळाले आहे, हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.हा अधिकारी म्हणाला की, कंपनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करीत आहे. त्यात कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या खर्चात कपात करण्याची कोणतीही योजना नाही.कंपनीच्या एकूण खर्चात कर्मचाऱ्यांवरील खर्चाचा वाटा केवळ १२ टक्के आहे. कर्मचाऱ्यांना दिले जाणारे विविध लाभ, भत्ते रद्द करणे किंवा समाप्त करणे ही खर्चातील कपातीची एक सोपी प्रणाली आहे. तथापि, त्यातून प्रदीर्घ अवधीसाठी काहीही साध्य होत नाही. त्यामुळेच कंपनीने कर्मचाऱ्यांवरील खर्चात कपात करण्याऐवजी उत्पन्न वाढीवर भर दिला आहे.