शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

Air India Sale : एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा सरकार विकणार; टाटा, हिंदुजा, स्पाइसजेट, इंडिगोला स्वारस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 06:10 IST

Air India Sale : टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही परदेशी कंपन्यांनी सरकारची ही कंपनी घेण्यात आतापर्यंत रस दाखविला आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या आणि कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या १00 टक्के हिस्सा विक्रीची निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी खरेदीदारांकडून स्वारस्यपत्रे मागणविण्यात आली आहे. ती देण्याची मुदत १७ मार्च असून, त्यानंतर लगेचच विक्रीचा निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही परदेशी कंपन्यांनी सरकारची ही कंपनी घेण्यात आतापर्यंत रस दाखविला आहे. मात्र त्यांच्यापैकी किती कंपन्या स्वारस्यपत्रे सादर करतात, हे १७ मार्चनंतरच स्पष्ट होईल.

या विक्री-खरेदीचा पूर्ण आर्थिक आर्थिक व्यवहार अर्नेस्ट अँड यंग या कंपनीतर्फे पूर्ण करण्यात येईल. तिची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी २0१८ सालीही एअर इंडियाच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी सरकारने केवळ ७६ टक्के हिस्साच विकण्याचे ठरविल्याने कोणीही खरेदीत रस दाखविला नव्हता. 

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियाच्या विक्री कशा प्रकारे करता येईल, हे ठरविण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नियुक्ती केली. त्या गटाने ठरविल्याप्रमाणे आता एअर इंडियाची १00 टक्के विक्री होणार असली तरी त्यात भारतीय कंपनीची ५१ टक्के तर परदेशी कंपनीची ४९ टक्के भागीदारी असू शकेल. म्हणजेच विक्रीनंतरही एअर इंडिया ही भारतीय कंपनीच राहील. एअर इंडिया जे कोणी विकत घेतील, त्यांच्यावर केवळ कंपनीच्या विमानांच्या तोट्याचीच जबाबदारी असेल.

एअर इंडियाच्या अन्य तोट्याचा बोजा त्यांच्यावर नसेल. म्हणजेच यावेळी केंद्र सरकारने १00 टक्के विक्रीची अधिक आकर्षक योजना व निविदा काढली आहे. म्हणजेच खरेदीदारांसाठी अधिक सवलती देऊ केल्या आहेत. त्यात एअर इंडियाबरोबरच संपूर्ण एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेडमधील १00 टक्के हिस्सेदारी आणि एआय सॅट्स एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा ५0 टक्के हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. या योजनेमुळे एअर इंडियाची विक्री सहज होईल, असे केंद्र सरकारला वाटत आहे.

एअर इंडिया कित्येक वर्षे तोट्यात असून, कर्जाच्या बोज्यामुळेही अडचणीत आहे. मध्यंतरी इंधन पुरवठा बंद करण्याचा इशारा तेल कंपन्यांनी दिला होता. देशातील पाच विमानतळांवर इंधन पुरवठा बंद करण्याची तयारीही त्या कंपन्यांनी सुरू केली होती. पण सरकारच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण मिटले.स्वामी जाणार कोर्टातएअर इंडियाच्या विक्रीस भाजपचे नेते खा, सुब्रमण्यम स्वामी यांनीच विरोध केला आहे. ही कंपनी विकण्याच्या विरोधात आपण न्यायालयात जाऊ , अशा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाAmit Shahअमित शहा