शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठाविणार -सरकारचा इशारा

By admin | Updated: March 13, 2016 23:17 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर

नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.जागतिक मंदीमुळे झालेले व्यावसायिक नुकसान पाहता कर्ज फेडताना गल्लत केली जाऊ नये. सहेतुक कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईलच, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. काही लोक खरोखरच बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले असून, मुद्दाम कर्ज बुडवले जाते. अशा लोकांसाठी कठोर कायदा अवलंबला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जावी यासाठी तपास संस्था कामाला लागल्या आहेत, असे ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.त्यांनी २ मार्च रोजी देशातून पसार झालेल्या मल्ल्या यांचा मात्र थेट उल्लेख केला नाही. बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच ते लंडनला गेल्याचे मानले जाते. मंदीमुळेही उद्योग डबघाईसजागतिक मंदी किंवा यापूर्वीच्या सरकारच्या धोरणात्मक अपयशामुळे जागतिक मंदीचा तडाखा झेलू न शकणाऱ्या कंपन्याही कर्जबाजारी बनल्या आहेत. कर्ज बुडविणाऱ्या अशा कंपन्यांचा वेगळा संच आहे. अनुत्पादक कर्जाबाबत (एनपीए) धोरणात्मक हस्तक्षेप करीत योग्य तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. चुकीच्या आर्थिक डावपेचांमुळे किंवा बाह्यघटकांमुळे व्यवसाय मोडकळीस येत असेल, तर त्यात बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे काहीही नाही. व्यावसायिक समस्या उद्भवणाऱ्या कंपन्यांना अशा प्रकारच्या समस्या येऊ नयेत, असे सरकारला वाटते. त्यामुळे सरकार ओळख पटविण्याचे काम करील. भविष्यात उद्योगावर नादारीची वेळ येऊ नये यासाठी संरचनात्मक मुद्यांकडे सरकार लक्ष घालेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र वारंटजीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीचा ५० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याबद्दल समन्स बजावूनही मल्ल्या यांनी न्यायालयात हजेरी न लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हैदराबादच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. मल्ल्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष असलेल्या मल्ल्या यांच्याविरुद्ध १४ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १० मार्च रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला. त्यांनी या प्रकरणी १३ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.>एअर इंडियाच्या नुकसानीबद्दल कुणी का बोलत नाही?हैदराबाद : एअर इंडियामध्ये सरकारने घातलेले ३० हजार कोटी आत्तापर्यंत पाण्यात गेले. तरी या कंपनीच्या कोणाही अधिकाऱ्याला जाब विचारला जात नाही. मग किंगफिशर एअरलाईन्सचे कर्ज थकले तर एवढा गहजब कशासाठी, असा सवाल इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी.व्ही. मोहनदास पै यांनी केला आहे.पै यांनी कर्ज प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी यंत्रणा आणण्याची गरजही प्रतिपादित केली. किंगफिशर नादार बनल्याबद्दल या कंपनीचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांना जबाबदार धरले जाते. मल्ल्या यांनी किंगफिशरचे १० हजार कोटी रुपये गमावले, मग ३० हजार कोटी गमावणाऱ्या एअर इंडियाचे काय? आकड्यांतील हा फरक किती? किंगफिशरने बँकांचे पैसे बुडविले. एअर इंडियाने करदात्यांचा पैसा गमावला. सर्वजण मल्ल्यांच्या मागे लागले. एअर इंडियाच्या नुकसानीबद्दल संसदेतही काही बोलले जात नाही. मीडियाही चूप आहे. त्यासाठी कुणाला जबाबदार धरले जात नाही. दोन्ही बाबी समान तेवढ्याच चुकीच्या आहेत. मल्ल्यांनी जे केले त्यासाठी ते संपूर्ण देशासोबत लढू शकत नाहीत, असेही पै यांनी स्पष्ट केले. पै हे यापूर्वी प्रत्यक्ष कर सुधारणेसंबंधी केळकर समितीचे सदस्य राहिले आहेत. >>५०५ अब्ज डॉलरचा काळा पैसा विदेशात?नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात ( सन २००४ ते २०१३) ५०५ अब्ज डॉलर एवढा काळा पैसा भारतातून परदेशात गेल्याच्या वृत्ताच्या अनुषंगाने महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) तपास सुरूकेला आहे. ग्लोबल फायनान्स इंटेग्रिटी (जीएफआय) या अमेरिकेतील तज्ज्ञ गटाच्या अहवालात ही बाब नमूद केली असल्याचे विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करणाऱ्या एसआयटीने डीआरआयला कामाला लावले आहे. जीएफआयच्या अहवालात नमूद केलेली काळ्या पैशाची आकडेवारी अचूक आहे की नाही याचा अभ्यास डीआरआयने चालविला आहे. व्यापाराच्या माध्यमातून काळा पैसा देशाबाहेर गेल्याचे संकेत उपरोक्त अहवालातून मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एसआयटीनेही विविध वृत्तांच्या आधारे हा दावा केला आहे. एका अहवालात एसआयटीने निर्यात आणि आयात डाट्यावर संस्थात्मक नियमन ठेवण्याची शिफारस केली आहे. >>कर्ज बुडविल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये मीडिया माझ्यामागे हात धुऊन लागल्याचा आरोप पुन्हा अज्ञात स्थळाहून टिष्ट्वट करून केला आहे. मी मीडियाशी बोलून माझा वेळ आणि प्रयत्न वाया घालविणार नाही, असेही ते म्हणाले. मल्ल्या यांनी टिष्ट्वटरवर संदेशांचा सपाटाच लावला आहे. त्यांनी विमान वाहतूक, क्रीडा आणि मद्य कंपन्यांमधील समस्याही मांडल्या आहेत. टिष्ट्वटचा मला कंटाळा आला असून लोकांना ते कळत नाही, असे त्यांचे पुत्र सिद्धार्थ यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले. > विशेषत: वस्तू बाजाराबाबत (कमोडिटी) आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात दराची तुलना केली जावी, असेही एसआयटीने सुचविले. जीएफआयने सदर अहवाल प्रकाशित केल्यानंतर एसआयटीने डीआरआयला या काळात विविध देशांमध्ये पाठविल्या गेलेल्या बेकायदा पैशाचा तपशील मागितला आहे. डीआरआयकडून मिळणाऱ्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा आहे.