शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

सरकार वेळेत करणार न्यायाधीशांच्या नियुक्त्या, सुप्रीम कोर्टात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 09:53 IST

४४ नावांची यादी सर्वोच्च न्यायालयाला पाठवली जाईल, असे ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी न्यायालयाला सांगितले.

नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठवलेल्या नावांवर विचार करण्यासाठीच्या कालमर्यादेचे आपण पालन करू, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला कळविले. कॉलेजियमने पाठवलेल्या ४४ नावांवर दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आले. 

४४ नावांची यादी सर्वोच्च न्यायालयाला पाठवली जाईल, असे ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय एस. ओका यांच्या खंडपीठाने कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी पाठवलेल्या पाच नावांच्या स्थितीबाबतही व्यंकटरमणी यांच्याकडे विचारणा केली.  

सुनावणी पुढे ढकललीत्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठवलेल्या नावांवर निर्णय घेण्यास केंद्राकडून कथितरीत्या विलंब झाल्याच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

ही तर चिंतेची बाब : कोर्टसरकार न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पुन्हा पाठवलेली नावेही परत पाठवत आहे, ही “चिंतेची बाब” आहे. सध्याच्या परिस्थितीत नावे परत पाठवल्यानंतर नियुक्ती रोखण्याचे काहीएक कारण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सध्याच्या प्रणालीहून अधिक चांगली प्रणाली आणण्यास कायदे मंडळाला कोणतीही अडचण येत नाही, परंतु, जोपर्यंत हा कायदा (कॉलेजियम प्रणाली) आहे तोपर्यंत त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, असे न्यायालय म्हणाले.

केंद्र सरकार म्हणाले...संबंधित निकालात नमूद कालमर्यादेचे पालन करण्याची ग्वाही सरकारने दिली असल्याचे ॲटर्नी जनरल यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय