शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

सरकारनं मीडियाच्या कामात नाक खुपसू नये- पंतप्रधान मोदी

By admin | Updated: November 16, 2016 16:38 IST

सरकारनं मीडियाच्या कामात हस्तक्षेप करू नये. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - सरकारनं मीडियाच्या कामात हस्तक्षेप करू नये. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आणीबाणीच्या काळात मीडियावर कशा प्रकारे बंदी घालण्यात आली हे आमच्या आजही लक्षात आहे. त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी देशातली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणली, असं म्हणत मोदींनी इंदिरा गांधी सरकारवर टीका केली आहे. जगासमोर सत्य उघड करणा-या पत्रकाराची हत्या हा गंभीर विषय आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिल्लीतल्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मीडिया स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चांगली भूमिका बजावते आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे. पत्रकारिता करताना पत्रकारांना जीव गमवावा लागत आहे, खरोखरचं ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची गरज असल्याचंही मतही त्यांनी मांडलं आहे.