शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

By admin | Updated: June 27, 2016 04:17 IST

(एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती.

नवी दिल्ली : अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती. या गटाचा सदस्य बनून भारत काही मिळविण्याऐवजी गमावणारच होता. सरकारमध्ये बसलेले लोक याबाबत दररोज दिशाभूल करीत आहेत, असे सांगत माजी विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.भारताने एनएसजीचे सदस्यत्व स्वीकारू नये हे मी ठामपणे सांगत आहे. आपल्याला जे हवे ते आधीच मिळाले आहे, असे ८३ वर्षीय सिन्हा यांनी स्पष्ट केले. भारताने सदस्यत्व मिळविण्यासाठी खूपच उत्सुकता आणि न मिळाल्यामुळे निराशा दर्शविली. त्याची काहीही आवश्यकता नाही. भारत एनएसजीच्या बाहेरच योग्य आहे. आपण सदस्य बनल्यास नुकसानच जास्त आहे. आपल्याला कोणताही लाभ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) >एनएसजी सदस्यत्वाच्या भारताच्या आशा पल्लवितअण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या भारतासारख्या देशांना प्रवेश देण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी अणु पुरवठादार समूहाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांची या वर्षाअखेर पुन्हा एक बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे ४८ सदस्यीय एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याबाबतच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तूर्त एनएसजीचे सदस्यत्व मिळाले नसले तरी आम्ही प्रयत्न सुरुच ठेवू. संबंध सुधारायचे असतील तर उभय देशांना परस्परांचे हित, चिंता व अग्रक्रम जपावे लागतील, हे चीनला पटवून देत राहू.- विकास स्वरूपसरकारला मुद्दा समजला काय?सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हा मुद्दा समजला की नाही ते माहीत नाही, मात्र सरकारमध्ये असे लोक बसले आहेत की ते सरकारची दररोज दिशाभूल करीत आहेत, हे मला माहीत आहे, असेही सिन्हा यांनी नमूद केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत सिन्हा हे विदेशमंत्री राहिले होते. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधासह मोदी सरकारच्या विदेश धोरणासंबंधी विविध मुद्यांवर रोखठोकपणे मते मांडली.