शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दहावी पास तरुणांना 'नोकरी'ची सुवर्णसंधी; इंडियन कोस्ट गार्डमध्ये निघाली भरती

By ravalnath.patil | Updated: November 23, 2020 18:01 IST

government jobs : निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.

ठळक मुद्देया जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे  दहावीमधील गुण 50 टक्के असले पाहिजेत.

देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी 18 ते 22 वर्षांपर्यंतचे तरुण अर्ज करू शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या नोकरीसाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. कुक, स्टीवर्ड यांसारख्या विविध पदांसाठी भरती असणार आहे.

30 नोव्हेंबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईलया जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार इंडियन कोस्ट गार्डमध्येच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे  दहावीमधील गुण 50 टक्के असले पाहिजेत. joinindiancoastguard.gov.in ही इंडियन कोस्ट गार्डची अधिकृत वेबसाइट आहे.

एकूण रिक्त पदांची संख्या 50दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या या जागांमधील एकूण रिक्त पदांची संख्या 50 आहे. ज्यासाठी उमेदवार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. एकूण 50 रिक्त जागांपैकी २० रिक्त जागांमध्ये 5 ईडब्ल्यूएस, 14 ओबीसी, 8 एससी आणि तीन रिक्त जागा एसटीसाठी आहेत. याचबरोबर, या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना वेतन ग्रेड 3 ते 47600 रुपये दरमहा मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना एकदा वाचली पाहिजे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  

टॅग्स :jobनोकरी