शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

भूसंपादन वटहुकूम आणण्यास सरकारला भाग पाडले

By admin | Updated: December 30, 2014 23:53 IST

विरोधी पक्षांशी साधकबाधक चर्चा न करता भूसंपादन वटहुकूम आणल्याबद्दल काँग्रेससह अनेक पक्षांनी सरकारवर जोरदार टीका चालवली असतानाच, सरकारने मात्र याचे खापर काँग्रेसच्या माथी फोडले आहे़

घमासान : सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर फोडले खापर, मागच्या दाराचा प्रयत्न हाणून पाडण्याचे विरोधकांचे आवाहननवी दिल्ली : विरोधी पक्षांशी साधकबाधक चर्चा न करता भूसंपादन वटहुकूम आणल्याबद्दल काँग्रेससह अनेक पक्षांनी सरकारवर जोरदार टीका चालवली असतानाच, सरकारने मात्र याचे खापर काँग्रेसच्या माथी फोडले आहे़ काँग्रेसच्या अडवणुकीच्या धोरणामुळे सरकारला भूसंपादन दुरुस्ती वटहुकूम आणणे भाग पडले़ सरकारकडे अन्य कुठलाही पर्याय नव्हता, असे सरकारने म्हटले आहे़आधीच्या ‘संपुआ’ सरकारने गेल्या जानेवारीत केलेल्या नवीन भूसंपादन कायद्यातील अनेक जाचक तरतुदींना वगळणाऱ्या वटहुकमास सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती़ संसदेत साधकबाधक चर्चा करून कायदे करण्याऐवजी वटहुकूम काढून सरकारने आपले निर्णय दामटणे लोकशाहीला मारक असल्याची टीका यानिमित्ताने सरकारवर होत आहे. मंगळवारी केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी विरोधकांची ही टीका धुडकावून लावली़ भूसंपादनच नाही तर कोळसा खाणपट्ट्यांचे लिलावाने वाटप करणे आणि विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणुकीची कमाल मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्यास मंजुरी देणारे वटहुकूम आणणे सरकारला भाग पडले़आर्थिक विकासास पूरक म्हणून सरकारने वटहुकमाचा मार्ग पत्करला, असे नायडू म्हणाले़ रालोआ सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीएमके, तसेच तामिळनाडूतील अन्य पक्षांनीही या वटहुकमाला विरोध केला आहे़ तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी याविरोधात भूमिका घेतली आहे़ सरकारने मागच्या दरवाजाने आणलेल्या वटहुकमामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी प्रभावित होतील, असा आरोप पीएमके संस्थापक एस़ रामदोस यांनी केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने वटहुकमाचा मार्ग अयोग्य असल्याचे म्हटले आहे़ आम्ही प्रतीक रूपात या वटहुकमाची प्रत जाळून विरोध नोंदवू, असे त्या पश्चिम बंगालच्या खडगपूर येथे म्हणाल्या़ काँगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी टिष्ट्वटरवर या मुद्याबाबत सरकारवर टीका केली़ रालोआ वटहुकमाचे सरकार आहे़ ते कुणाचे प्रतिनिधित्व करतात, हे आता स्पष्ट झाले आहे़ भूसंपादन कायद्यातील बदल शेतकऱ्यांच्या हिताविरुद्धचे आहेत़ भाजपा शेतकरीविरोधी आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे़ माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनीही या निमित्ताने सरकारवर तोफ डागली आहे़ रालोआ सरकार कॉर्पोरेटचे, कॉर्पोरेटद्वारे आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठीचे सरकार आहे, असे ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)नवी दिल्ली : भूसंपादन कायद्यातील बदलाच्या मुद्यावर काँग्रेसने मंगळवारी आग्रही भूमिका घेत, याविरुद्ध सर्व शेतकरी समर्थक पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले़ भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या शेतकरीविरोधी आहेत़ या दुरुस्त्यांविरुद्ध सर्व शेतकरी समर्थक राजकीय पक्षांनी एकत्र यावे व सरकारने आणलेला वटहुकूम हाणून पाडावा, असे काँग्रेसने म्हटले़