शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

धर्मांतर, सुशासन दिनाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे सरकारची स्पष्टोक्ती : सर्वांचा विकास हेच ध्येय

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़

नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़
शनिवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर आणि सुशासनाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारचा जोरदार बचाव केला़ सरकार वादांनी घेरलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे़ प्रत्यक्षात काँग्रेस केवळ राजकीय लाभासाठी राज्यसभेचे कामकाज हाणून पाडत आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधकांनी अनावश्यकपणे ताणले़ आमच्या सरकारला सुशासन हवे आहे़ विकास हवा आहे़ आमचे हेच ध्येय आहे आणि त्यावर आमचा भर आहे़ सबका साथ, सबका विकास, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तेव्हा त्यात हिंदू, मुस्लीम, आदिवासी, ख्रिश्चन सर्वांचाच विकास अभिप्रेत असतो, असे प्रसाद म्हणाले़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समूहांद्वारे उत्तर प्रदेशात धर्मांतर कार्यक्रम आयोजित केले गेले़ याकडे लक्ष वेधले असता त्यांनी चेंडू उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारकडे टोलवला़ प्रलोभन देऊन धर्मांतर होत असेल तर सरकार अशा कुठल्याही धर्मांतराविरुद्ध आहे़ उत्तर प्रदेशात असे कृत्य हाणून पाडण्याची जबाबदारी तेथील सरकारची आहे, असे प्रसाद म्हणाले़