शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

धर्मांतर, सुशासन दिनाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे सरकारची स्पष्टोक्ती : सर्वांचा विकास हेच ध्येय

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़

नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़
शनिवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर आणि सुशासनाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारचा जोरदार बचाव केला़ सरकार वादांनी घेरलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे़ प्रत्यक्षात काँग्रेस केवळ राजकीय लाभासाठी राज्यसभेचे कामकाज हाणून पाडत आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधकांनी अनावश्यकपणे ताणले़ आमच्या सरकारला सुशासन हवे आहे़ विकास हवा आहे़ आमचे हेच ध्येय आहे आणि त्यावर आमचा भर आहे़ सबका साथ, सबका विकास, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तेव्हा त्यात हिंदू, मुस्लीम, आदिवासी, ख्रिश्चन सर्वांचाच विकास अभिप्रेत असतो, असे प्रसाद म्हणाले़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समूहांद्वारे उत्तर प्रदेशात धर्मांतर कार्यक्रम आयोजित केले गेले़ याकडे लक्ष वेधले असता त्यांनी चेंडू उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारकडे टोलवला़ प्रलोभन देऊन धर्मांतर होत असेल तर सरकार अशा कुठल्याही धर्मांतराविरुद्ध आहे़ उत्तर प्रदेशात असे कृत्य हाणून पाडण्याची जबाबदारी तेथील सरकारची आहे, असे प्रसाद म्हणाले़