शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

संसदेत दिलेल्या 70 टक्के आश्वासनांचा सरकारला विसर

By admin | Updated: February 6, 2017 09:20 IST

केद्रीय मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी 70 टक्के आश्वासनं अजूनही पुर्ण झालेली नाहीत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - निवडणुकीत मोठमोठी आश्वासनं देऊन निवडणूक जिंकायची आणि जिंकल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचं ही राजकारण्यांची ठरलेली रणनीती. सत्तेत असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांना तर संसदेत दिलेल्या आश्वासनांचाही विसर पडलेला आहे. केद्रीय मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी 70 टक्के आश्वासनं अजूनही पुर्ण झालेली नाहीत. फक्त 30 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचं समोर आलं आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. आता त्यांनी सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केलं आहे, की ती पुर्ण करायला वेळ मिळाला नाही हे त्यांनाच माहित. 
 
(तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल)
 
दिलेल्या आश्वासनांपैकी फक्त 29 टक्के आश्वासनांवर अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र अपुर्ण आश्वासनांची यादी जास्तच मोठी आहे. अहवालानुसार प्रत्येक आश्वासन पुर्ण झालं की नाही याची जबाबदारी संबंधित मंत्री तसंच खात्याशिवाय लोकसभेच्या 15 सदस्यीस स्थायी समितीचीही असते. मात्र यानंतरही इतकी आश्वासनं अपुर्ण राहिली आहेत. 
 
तीन महिन्यांचा मिळतो कालावधी - 
संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री नंतर संपुर्ण माहिती पुरवण्याचं आश्वासन देतात. कोणत्याही चर्चत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरही विचार केला जाईल असं आश्वासनही हमखास दिलं जातं. यामधील अनेक मुद्दे विकासाशी संबंधित असतात. व्यक्तिगत आश्वासनं वगळता इतर आश्वासनं पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबधित मंत्रालय तसंच खात्याची असते. तसंच हे आश्वासनं तीन महिन्यात पुर्ण होईल याची खात्रीही मंत्रालयाला घ्यायची असते. संसदेत दिलेल्या आश्वासनाचं पुढे काय झालं, याचा आढावाही संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत घेतला जातो.
 
सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर देखदेख करण्यासाठी लोकसभेच्या 15 सदस्यांची स्थायी समिती आहे. पूर्तता न झाल्यास ही समिती गरज भासल्यास संबंधित मंत्रालयाच्या किंवा खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून विलंबाची कारणं विचारते.परंतु ही समिती असूनही फक्त 30 टक्केच आश्वासनांची पूर्तता झालेली आहे.