शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

जैतापूरच्या जनजागृतीत सरकार अपयशी

By admin | Updated: May 16, 2015 03:51 IST

अणुऊर्जेचे फायदे काय आहेत हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश येत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत

नवी दिल्ली : अणुऊर्जेचे फायदे काय आहेत हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश येत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सरकारच दोषी आहे, असे मत केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेकडून केला जाणारा जोरदार विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढल्यानंतर दोनच दिवसांनी सिंग यांनी हे मत व्यक्त केले आहे.महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ९९०० मेगावॉट क्षमतेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा सर्वांत वैभवशाली अणुऊर्जा प्रकल्प बनावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रकल्पाबाबत अनेक चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. परंतु एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आम्ही याकडे बघत आहोत. संपूर्ण अणुऊर्जा विभागाचे याकडे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यात कदाचित आम्ही कमी पडलो आहोत, असे सिंग म्हणाले.वास्तविक, हा प्रकल्प पर्यावरणाला पोषक आणि वातावरणाला पोषक असा प्रकल्प आहे. आम्ही लोकांना त्याचे फायदे पटवून देण्यात अपयशी ठरलो तर हा प्रकल्प रखडेल आणि त्याचा दोष सरकारलाच द्यावा लागेल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. ‘असोचेम’ने आयोजित केलेल्या अणुऊर्जा संमेलनात ते बोलत होते. सिंग म्हणाले, आम्ही सर्व बाबींचा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या भागात अणुऊर्जा प्रकल्प असणे हे धोकादायक वा हानिकारक नाही, हे या अभ्यासामधून सिद्ध झाले असल्याचे लोकांना सांगण्याची आज गरज आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव रतनकुमार सिन्हा यांनीही जैतापूर प्रकल्प सुरू करण्याचे समर्थन केले. या प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)