शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

जैतापूरच्या जनजागृतीत सरकार अपयशी

By admin | Updated: May 16, 2015 03:51 IST

अणुऊर्जेचे फायदे काय आहेत हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश येत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत

नवी दिल्ली : अणुऊर्जेचे फायदे काय आहेत हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश येत आहे. परिणामी, महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सरकारच दोषी आहे, असे मत केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेकडून केला जाणारा जोरदार विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढल्यानंतर दोनच दिवसांनी सिंग यांनी हे मत व्यक्त केले आहे.महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ९९०० मेगावॉट क्षमतेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा सर्वांत वैभवशाली अणुऊर्जा प्रकल्प बनावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रकल्पाबाबत अनेक चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. परंतु एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आम्ही याकडे बघत आहोत. संपूर्ण अणुऊर्जा विभागाचे याकडे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यात कदाचित आम्ही कमी पडलो आहोत, असे सिंग म्हणाले.वास्तविक, हा प्रकल्प पर्यावरणाला पोषक आणि वातावरणाला पोषक असा प्रकल्प आहे. आम्ही लोकांना त्याचे फायदे पटवून देण्यात अपयशी ठरलो तर हा प्रकल्प रखडेल आणि त्याचा दोष सरकारलाच द्यावा लागेल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. ‘असोचेम’ने आयोजित केलेल्या अणुऊर्जा संमेलनात ते बोलत होते. सिंग म्हणाले, आम्ही सर्व बाबींचा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या भागात अणुऊर्जा प्रकल्प असणे हे धोकादायक वा हानिकारक नाही, हे या अभ्यासामधून सिद्ध झाले असल्याचे लोकांना सांगण्याची आज गरज आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव रतनकुमार सिन्हा यांनीही जैतापूर प्रकल्प सुरू करण्याचे समर्थन केले. या प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)