शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-काँग्रेसमध्ये छेडणार युद्ध

By admin | Updated: May 17, 2015 01:48 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सरकारच्या या कारकीर्दीतील यश-अपयशावरून सरकार आणि काँग्रेसदरम्यान नव्या संघर्षाचा बिगुल वाजणार आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सरकारच्या या कारकीर्दीतील यश-अपयशावरून सरकार आणि काँग्रेसदरम्यान नव्या संघर्षाचा बिगुल वाजणार आहे. उभय पक्षांनी ढोलताशे आणि नगाऱ्यांसह याची जय्यत तयारी केली आहे. एकीकडे सरकारने आपल्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमक्ष मांडण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गेल्या ६५ वर्षांत कोणतेही सरकार करू शकले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३६५ दिवसांत करून दाखविले, हे जनतेच्या गळी उतरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारने संपूर्ण शासकीय यंत्रणेला या कामी जुंपले आहे. हा गाजावाजा करताना कुठलीही कसर बाकी राहू नये म्हणून भाजपकडून आपल्या मंत्री आणि खासदारांनाही ताकीद देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या ढोलताशांना नगाऱ्याने प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. केंद्रात सरकार स्थापन होण्यापूर्वी मोदी, भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांनी कुठली आश्वासने दिली होती आणि वर्षभरात काय झाले याचा लेखाजोखा काँग्रेस जनतेसमोर मांडणार आहे. काँग्रेसने पक्षाच्या ६० ज्येष्ठ नेत्यांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली असून, हे नेते देशभर दौरे करून सुटाबुटातील सरकारने काय केले हे लोकांना सांगतील. या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आदींचा समावेश आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम २२ मेपासून सुरू होणार आहे. एकट्या दिल्लीत विविध मुद्यांवर अर्ध्या डझनावर पत्रपरिषदा होतील. यासोबतच सर्व राज्यांच्या राजधानीमध्येही असा प्रयत्न केला जाईल.च्सरकारच्या कामकाजाचा आढावा घेणारे पुस्तकही काँग्रेस प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना केवळ नाव बदलून मोदी सरकारने लागू केल्या आहेत. त्यांचा पर्दाफाश या पुस्तकात केला जाईल. च्याशिवाय परकीय भूमीवर देशातील यापूर्वीच्या सरकारांवर टीका करून मोदी कसे तोंडघशी पडले, याचा नमुना यात असेल. विदेशमंत्री देशात आणि पंतप्रधान विदेशात; याचा अर्थ विदेश मंत्रालयाचा कारभार थेट मोदी सांभाळतात का? आणि असे असेल तर विदेशमंत्र्याची गरजच काय? या प्रश्नासह जीएसटी, भूसंपादन, बांगलादेश भूमी सीमा आदी विधेयकांना विरोधी पक्षात असताना विरोध करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर केलेला घूमजाव यांचाही ऊहापोह असणार आहे.