शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सरकार-काँग्रेसमध्ये छेडणार युद्ध

By admin | Updated: May 17, 2015 01:48 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सरकारच्या या कारकीर्दीतील यश-अपयशावरून सरकार आणि काँग्रेसदरम्यान नव्या संघर्षाचा बिगुल वाजणार आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सरकारच्या या कारकीर्दीतील यश-अपयशावरून सरकार आणि काँग्रेसदरम्यान नव्या संघर्षाचा बिगुल वाजणार आहे. उभय पक्षांनी ढोलताशे आणि नगाऱ्यांसह याची जय्यत तयारी केली आहे. एकीकडे सरकारने आपल्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमक्ष मांडण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गेल्या ६५ वर्षांत कोणतेही सरकार करू शकले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३६५ दिवसांत करून दाखविले, हे जनतेच्या गळी उतरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारने संपूर्ण शासकीय यंत्रणेला या कामी जुंपले आहे. हा गाजावाजा करताना कुठलीही कसर बाकी राहू नये म्हणून भाजपकडून आपल्या मंत्री आणि खासदारांनाही ताकीद देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या ढोलताशांना नगाऱ्याने प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. केंद्रात सरकार स्थापन होण्यापूर्वी मोदी, भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांनी कुठली आश्वासने दिली होती आणि वर्षभरात काय झाले याचा लेखाजोखा काँग्रेस जनतेसमोर मांडणार आहे. काँग्रेसने पक्षाच्या ६० ज्येष्ठ नेत्यांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली असून, हे नेते देशभर दौरे करून सुटाबुटातील सरकारने काय केले हे लोकांना सांगतील. या नेत्यांमध्ये पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आदींचा समावेश आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम २२ मेपासून सुरू होणार आहे. एकट्या दिल्लीत विविध मुद्यांवर अर्ध्या डझनावर पत्रपरिषदा होतील. यासोबतच सर्व राज्यांच्या राजधानीमध्येही असा प्रयत्न केला जाईल.च्सरकारच्या कामकाजाचा आढावा घेणारे पुस्तकही काँग्रेस प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना केवळ नाव बदलून मोदी सरकारने लागू केल्या आहेत. त्यांचा पर्दाफाश या पुस्तकात केला जाईल. च्याशिवाय परकीय भूमीवर देशातील यापूर्वीच्या सरकारांवर टीका करून मोदी कसे तोंडघशी पडले, याचा नमुना यात असेल. विदेशमंत्री देशात आणि पंतप्रधान विदेशात; याचा अर्थ विदेश मंत्रालयाचा कारभार थेट मोदी सांभाळतात का? आणि असे असेल तर विदेशमंत्र्याची गरजच काय? या प्रश्नासह जीएसटी, भूसंपादन, बांगलादेश भूमी सीमा आदी विधेयकांना विरोधी पक्षात असताना विरोध करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर केलेला घूमजाव यांचाही ऊहापोह असणार आहे.