शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

वन रँक वन पेन्शन योजनेसाठी सरकार कटिबद्ध - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 30, 2015 11:43 IST

माजी सैनिकांसाठी असलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेप्रती सरकार कटिबद्ध असून तिच्या अंमलबजावणीबद्दल कोणालाही शंका नसावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० -  माजी सैनिकांसाठी असलेल्या  ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेप्रती सरकार कटिबद्ध असून ती लागू होण्याबद्दल कोणालाही शंका नसावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. 
सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतरही ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेची देशात अंमलबजावणी न केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या मुलखतीदरम्यान मोदींनी त्याचा समाचार घेतला. ' काँग्रेस या (वन रँक वन पेन्शन) मुद्याचे राजकारण करत आहे. ते सत्तेवर असताना त्यांनी या योजनेसाठी काहीही काम केले नाही, त्यामुळे त्यांना या विषयावर काहीच बोलण्याचा अधिकार नाही,' असे त्यांनी सुनावले. ' या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणाच्याही मनात संदेह नसावा. आम्ही याप्रकरणी संबंधितांशी चर्चा करत आहोत. सैनिकांचे हित लक्षात घेऊनच त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल' असे त्यांनी सांगितले.
या मुलाखतीदरम्यान मोदींनी भूमी-अधिग्रहण विधेयकाच्या मुद्यावरही मत मांडले. 'भूमी अधिग्रहण विधेयक हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा अथवा जीवन-मरणाचा प्रश्न नाही. तसेच हा पक्षाचा किंवा सरकारचाही अजेंडा नाही. या विधेयकाचा मसुदा सर्व मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच तयार करण्यात आला असून त्याबाबत अजूनही कोणी काही सूचना दिल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू. हे विधेयक शेतकरी-विरोधी असल्याचा अपप्रचार सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले. 
राहुल गांधी यांच्या 'सुटा-बुटातील सरकार' या टीकेलाही मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'विरोधी पक्षांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते हताश झाले असून त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत' असे मोदी म्हणाले.