शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नेट न्यूट्रॅलिटीसाठी सरकार वचनबद्ध

By admin | Updated: May 6, 2015 00:42 IST

सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी दिली जाईल, भेदभावाला कोणताही वाव नसेल, अशी ग्वाही सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी दिली जाईल, भेदभावाला कोणताही वाव नसेल, अशी ग्वाही सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय) सरकारला सादर केलेल्या सल्लामसलत पत्रावर सर्वच विरोधी पक्षांनी राजकीय भेद बाजूला सारत सडकून टीका केली. सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी मिळेल. नेट तटस्थतेच्या मूलभूत संकल्पनेशी सरकार कटिबद्ध असेल. सर्वांना इंटरनेट प्रवेशाची तसेच उपलब्धतेची समान संधी प्रदान केली जाईल, असे दूूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंटरनेट तटस्थतेसंबंधी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना केली. पंधरवड्यापूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत नेट तटस्थतेच्या मुद्यावर चर्चा छेडली तेव्हा तणाव निर्माण झाला होता. राज्यसभेत मात्र याउलट मतैक्याचे वातावरण दिसून आले. भाजप आणि शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केलेली एकमुखी चिंता पाहता नेट तटस्थतेच्या मुद्यावर संपूर्ण सभागृह एकमुखाने बोलत असल्याकडे प्रसाद यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मिठाच्या सत्याग्रहाशी केली तुलना> चर्चेत सदस्यांनी सभागृहाला केल्या जात असलेल्या वीज व पाणी पुरवठ्याचा मुद्दा नेट तटस्थतेशी जोडत चर्चा रंगतदार बनविली. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरानुसार किंवा नळ कुठे लागला आहे या आधारावर स्वतंत्र दर आकारले जात नाही, तसेच नेट तटस्थतेचे असावे. > भाजपच्या एका सदस्याने तर नेट तटस्थतेच्या लढ्याची तुलना चक्क महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहाशी केली. दूरसंचार कंपन्यांना त्यांनी ‘शेलॉक’ आणि ‘शार्क’ असे संबोधले.> इंटरनेट स्वातंत्र्यासाठी कोणत्याही सत्याग्रहाची गरज नाही. सरकार नेट स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध आहे. या विषयाशी निगडित अनेक मुद्यांवर सार्थक निर्णयासाठी सल्लामसलतीची गरज आहे.- रविशंकर प्रसाद, दूरसंचारमंत्री> सल्लामसलत पत्रासाठी सूचना आणि शिफारशी देणाऱ्या १० लाख नागरिकांचे ई-मेल आयडी जाहीर करीत ट्रायने लोकांच्या खासगीपणाच्या मुद्याशी तडजोड केलेली आहे.- डेरेक ओ ब्रायन, लक्षवेधी मांडणारे तृणमूल खासदार