शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सरकारी बँकांचं होणार विलीनीकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:11 IST

सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19- सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे. या संदर्भात सरकार एका योजनेवर काम करत आहे. त्यानुसार बँकांची संख्या मर्यादित ठेवून त्यातून किमान तीन ते चार जागतिक दर्जाच्या बँका उभारण्याचा केंद्राचा हेतू असल्याची माहिती मिळते आहे.
 
गेल्याच महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकांच्या एकत्रिकरणावर काम सुरू असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी, या विषयीचा सविस्तर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला होता. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलीनीकरण यशस्वी झाल्यानंतर अर्थ मंत्रालय आणखी एका मोठ्या विलीनीकरणावर विचार करीत आहे. मात्र, सध्या सरकारी बँकांवर असणारा थकीत कर्जाचा बोजा हलका केल्यानंतरच विलीनीकरणाचा विचार करण्यात येणार आहे.  बँकांचं अधिग्रहण करताना मोठ्या बँकांना छोट्या बँकांची कर्ज, मनुष्यबळ, भौगोलिक स्थिती हे घटक लक्षात घ्यावे लागणार आहेत. 
आणखी वाचा
 

अदानी समूहाच्या इशा-यानंतर EPW च्या संपादकांचा राजीनामा

"कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अ‍ॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर

संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी

सध्या अस्तित्वात असलेल्या २१ बँकांचं विलिनीकरण करून त्यांची संख्या १२ करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानंतर तीन बँकांची एक बँक याप्रमाणे जागतिक दर्जाच्या चार बँकांच्या निर्मितीची योजना आहे. या नव्या बँका भारतीय स्टेट बँकेइतक्या मोठ्या असतील. या शिवाय पंजाब अँड सिंध बँक आणि आंध्र बँक या बँका स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. शिवाय काही मध्यम आकाराच्या बँकांचेही स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका आणि महिला बँकेचे एक एप्रिल २०१७ रोजी स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया आदी बँकांकडून अधिग्रहणासाठी तयार असलेल्या बँकांचा शोध सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.