शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-विरोधकांमधील कोंडी कायम

By admin | Updated: February 23, 2016 01:40 IST

संसदेचे आज मंगळवारपासून प्रारंभ होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडावे यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसंसदेचे आज मंगळवारपासून प्रारंभ होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडावे यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतानाच एकजूट झालेले विरोधी पक्ष हे सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या १६ मार्च रोजी संपणाऱ्या पहिल्या भागामध्ये रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्पांशिवाय अन्य कोणतेही सरकारी कामकाज चालूच द्यायचे नाही, असापक्का निर्धार केल्याचे संकेत आहेत.जीएसटी, रिअल इस्टेट आणि बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) विधेयक यांसारखी अनेक महत्त्वाची विधेयके २५ एप्रिलपासून प्रारंभ होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या भागामध्येच मांडली जाण्याची शक्यता आहे. अर्थात पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच या दुसऱ्या भागातील अधिवेशनाचे कामकाज निर्भर राहणार आहे. जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठातील अशांततेशी झगडत असलेल्या मोदी सरकारसाठी आता जाट आरक्षण आंदोलन आणि न थांबणारा हिंसाचार नवी डोकेदुखी ठरला आहे.राष्ट्रपतींनी अगोदरच वटहुकूम जारी केला असल्याने आता सरकारला एनिमी प्रापर्टी (दुरुस्ती आणि व्हॅलिडेशन) विधेयक पारित करून घ्यावे लागणार आहे. या विधेयकाबाबत काही वाद आहेत. परंतु सरकारने या विधेयकाला वित्त विधेयक बनविल्याने ते राज्यसभेत बहुमताने मंजूर करण्याची आवश्यकता पडणार नाही. याआधीची दोन महत्त्वाची संसद अधिवेशन विरोधकांच्या गदारोळात वाहून गेली आहेत, याची सरकारचा पुरती जाणीव आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी सुरळीतपणे चालले पाहिजे, अशी सरकारची इच्छा आहे.लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली असतानाही संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी त्याआधी विशेष सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे हे सरकारच्या नैराश्येचेच द्योतक म्हणावे लागेल. सरकार संसदेत सर्वच मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे, असे सांगून नायडू यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे सुमित्रा महाजन यांनीही लोकसभेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी असाधारण पाऊल उचलताना अशीच सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि त्यानंतर राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी दुसरी बैठक आयोजित केली होती. दरम्यान जाट आंदोलनावर भाष्य करताना वेंकय्या नायडू म्हणाले, ‘परिस्थिती निवळल्यानंतरच या मुद्यावर चर्चा केली जाईल. भाजपाने एक कमिटी स्थापन केली आहे. परिस्थिती शांत झाल्यानंतर आम्ही या मुद्यावर केवळ चर्चा करू शकतो.’सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेली विधेयकेजीएसटी विधेयक, एनिमी प्रापर्टी (दुरुस्ती आणि व्हॅलिडेशन) विधेयक, बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) दुरुस्तीविधेयक, अपहरणविरोधी विधेयक, रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) विधेयक, उद्योग (विकास आणि नियमन) दुरुस्तीविधेयक, हवाई वाहतूक (दुरुस्ती) विधेयक, राष्ट्रीय जलमार्ग विधेयक, ब्युरो आॅफ इंडियन स्टँडर्ड विधेयक, व्हिसलब्लोअर संरक्षण (दुरुस्ती) विधेयक, संविधान (अनुसूचित जाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक, निवडणूक कायदा (दुरुस्ती) विधेयक आणि भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक.