शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

सरकार नमले! आणखी एक यूटर्न

By admin | Updated: September 23, 2015 02:16 IST

फेसबुक, टिष्ट्वटर, गूगल हँगआऊट आणि व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर पाठविलेले सर्व मेसेज किमान ९० दिवसांपर्यंत जपून ठेवणे बंधनकारक

नवी दिल्ली : फेसबुक, टिष्ट्वटर, गूगल हँगआऊट आणि व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर पाठविलेले सर्व मेसेज किमान ९० दिवसांपर्यंत जपून ठेवणे बंधनकारक करणाऱ्या वादग्रस्त एन्क्रिप्शन धोरणाचा मसुदा सोशल मीडिया युजर्सच्या प्रखर विरोधापुढे नमते घेत केंद्र सरकारने अखेर मागे घेतला.‘या एन्क्रिप्शन धोरणाच्या मसुद्यात व्यक्त केलेल्या काही विचारांमुळे विनाकारण संशय निर्माण होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे हा मसुदा मागे घेणे आणि त्यावर योग्य पद्धतीने विचार करून तो पुन्हा सार्वजनिक करण्याचे निर्देश आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला दिलेले आहेत,’ असे केंद्रीय दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.सामान्यत: सर्व व्हॉट्स अ‍ॅप, व्हायबर, लाइन, गूगल चॅट, याहू मेसेंजर आणि अशा सर्व आधुनिक संदेश सेवा उच्चस्तरीय एन्क्रिप्शनसह येत असतात; आणि अनेकदा सुरक्षा संस्थांना हे संदेश मध्येच पकडणे कठीण जात असते. प्रसाद म्हणाले, ‘मसुदा सार्वजनिक करण्यात आल्याचे आणि त्यावर मतेही मागविण्यात आल्याचे मला सांगण्यात आले होते. हा केवळ मसुदा आहे, सरकारचे मत नाही, हे मी सांगू इच्छितो. मी जनतेच्या मतांचाही विचार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. सोबतच लोक, कंपन्या, सरकार आणि व्यावसायिकांदरम्यान सायबर क्षेत्रात आदानप्रदान वेगाने वाढतआहे, हेही आम्ही मान्य करायला पाहिजे.’सरकारने सोमवारी जारी केलेल्या या एन्क्रिप्शन धोरणाच्या मसुद्यानुसार, युजर्सने व्हॉट्स अ‍ॅप्प, एसएमएस, ई-मेल अथवा अन्य कोणत्याही सेवेद्वारे पाठविलेला कोणताही संदेश ९० दिवसपर्यंत जतन करून ठेवणे आणि सुरक्षा संस्थांनी मागणी केल्यावर तो त्यांना उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले होते. या धोरणाच्या मसुद्यात ९० दिवसांच्या आत मेसेज डिलिट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही प्रस्ताव आहे. एखादा संदेश जतन करून न ठेवणे आणि मोबाईल संच वा संगणकाद्वारे पाठविण्यात आलेला एन्क्रिप्शन मेसेज न दाखविण्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद त्यात आहे. हे धोरण सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था, नागरिक आणि अन्य सर्व प्रकारच्या संवाद माध्यमांना लागू राहील,असे स्पष्ट करण्यात आले होते. या एन्क्रिप्शन धोरणाच्या मसुद्यावर चौफेर टीका करण्यात आल्यानंतर सरकारने नमते घेत हा मसुदा मागे घेतला आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने आधी हा एन्क्रिप्शन धोरणाचा मसुदा जारी केला आणि २४ तासांच्या आतच त्यात बदल केला व त्यानंतर जनतेकडून विरोध होताच हा मसुदा मागे घेतला. हा मसुदा म्हणजे इंटरनेट सुरक्षेच्या नावावर जनतेची २४ तास हेरगिरी करणे आणि लायसेंस व पंजीकरण राज परत आणण्याचा कट आहे. या नव्या धोरणामुळे सर्व जनता सरकारच्या निगरानीखाली येईल.- रणदीप सुरजेवाला, मुख्य प्रवक्ते, काँग्रेसमसुदा एन्क्रिप्शन धोरण हे जनतेची हेरगिरी करण्याचे साधन होते. त्यातून सरकारची एकाधिकारशाही प्रवृत्ती दिसून येते. हे धोरण व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे घोर उल्लंघन करणारे होते. - राघव चढ्ढा, प्रवक्ते, आम आदमी पार्टी (वृत्तसंस्था)