शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

पुरस्कारवापसी हा सरकार व लोकांचा अपमान - कमल हसन

By admin | Updated: November 3, 2015 14:42 IST

पुरस्कार परत करणे हे निष्फळ असून तसे करून तुम्ही सरकार व तुमच्यावर प्रेम करणा-या लोकांचा अपमान कराल असे सांगत कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पुरस्कार परत करणे हे निष्फळ असून तसे करून तुम्ही सरकार व तुमच्यावर प्रेम करणा-या लोकांचा अपमान करता' असे सांगत ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांच्या निषेधार्थ लेखक, कलाकार, वैज्ञानिक 'पुरस्कार वापसी' मोहिमेत उतरले आहेत मात्र कमल हसन यांना हा मार्ग योग्य वाटत नाही पुरस्कार परत करणे निष्फळ असल्याचे मत त्यांनी मांडले. 
ज्यांनी ज्यांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते स्वीकारावेत आणि त्यांची भावना त्यांनी वेगळ्या प्रकारे व्यक्त करावी. ते एखादा चांगला सणसणीत लेख लिहू शकतात आणि आणखी जास्त चांगल्याप्रकारे लोकांचे लक्ष वेधू शकतात असं कमल हसन यांनी सांगितले.
असहिष्णूता म्हणाल, तर ती देशात १९४७ पासून सुरू आहे. असहिष्णूतेमुळे एकदा देशाची फाळणी झाली असल्याचे सांगत कमल हसन यांनी साहित्यिकांनीपण सहिष्णूतता दाखवायला हवी अशी गरज व्यक्त केली आहे. कुठलंही सरकार असो त्यांच्यावर टीका करायचा आपल्याला अधिकार आहे, ते करायलाच हवं, परंतु ते करण्याचे मार्ग वेगळे आहेत आणि त्यामध्ये पुरस्कार परत करण्याच्या मार्गाची गरज नाही. पुरस्कारवापसी हा राजकीय प्रेरणेने झालेला प्रकार आहे, का यावर त्यांनी तशी शक्यता व्यक्त केली आणि प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही राजकीय प्रेरणा असतात असे मत व्यक्त केले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिऴविणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यासह दहा दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. 
मात्र ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना निषेधाचा हा मार्ग मान्य नाही. विरोधाचे इतरही मार्ग आहेत असे सांगत सहिष्णूता ही दोन्ही बाजूंनी असली पाहिजे, असे ते म्हणाले. याच असहिष्णूतेमुळे देशाचे विभाजन झाले होते, आता पुन्हा त्यामुळेच देशाचे तुकडे होऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.