शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारवापसी हा सरकार व लोकांचा अपमान - कमल हसन

By admin | Updated: November 3, 2015 14:42 IST

पुरस्कार परत करणे हे निष्फळ असून तसे करून तुम्ही सरकार व तुमच्यावर प्रेम करणा-या लोकांचा अपमान कराल असे सांगत कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पुरस्कार परत करणे हे निष्फळ असून तसे करून तुम्ही सरकार व तुमच्यावर प्रेम करणा-या लोकांचा अपमान करता' असे सांगत ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांच्या निषेधार्थ लेखक, कलाकार, वैज्ञानिक 'पुरस्कार वापसी' मोहिमेत उतरले आहेत मात्र कमल हसन यांना हा मार्ग योग्य वाटत नाही पुरस्कार परत करणे निष्फळ असल्याचे मत त्यांनी मांडले. 
ज्यांनी ज्यांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते स्वीकारावेत आणि त्यांची भावना त्यांनी वेगळ्या प्रकारे व्यक्त करावी. ते एखादा चांगला सणसणीत लेख लिहू शकतात आणि आणखी जास्त चांगल्याप्रकारे लोकांचे लक्ष वेधू शकतात असं कमल हसन यांनी सांगितले.
असहिष्णूता म्हणाल, तर ती देशात १९४७ पासून सुरू आहे. असहिष्णूतेमुळे एकदा देशाची फाळणी झाली असल्याचे सांगत कमल हसन यांनी साहित्यिकांनीपण सहिष्णूतता दाखवायला हवी अशी गरज व्यक्त केली आहे. कुठलंही सरकार असो त्यांच्यावर टीका करायचा आपल्याला अधिकार आहे, ते करायलाच हवं, परंतु ते करण्याचे मार्ग वेगळे आहेत आणि त्यामध्ये पुरस्कार परत करण्याच्या मार्गाची गरज नाही. पुरस्कारवापसी हा राजकीय प्रेरणेने झालेला प्रकार आहे, का यावर त्यांनी तशी शक्यता व्यक्त केली आणि प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही राजकीय प्रेरणा असतात असे मत व्यक्त केले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिऴविणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यासह दहा दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. 
मात्र ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना निषेधाचा हा मार्ग मान्य नाही. विरोधाचे इतरही मार्ग आहेत असे सांगत सहिष्णूता ही दोन्ही बाजूंनी असली पाहिजे, असे ते म्हणाले. याच असहिष्णूतेमुळे देशाचे विभाजन झाले होते, आता पुन्हा त्यामुळेच देशाचे तुकडे होऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.