शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: सरकार व न्यायपालिकेत सारे आलबेल, विरोधकच नकारात्मक : किरेन रिजिजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:24 IST

किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बोलत होते. 

भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र होती, आहे व स्वतंत्रच राहील, याची खात्री बाळगा. न्यायालयांच्या अधिकारांमध्ये सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. सरकार व न्यायव्यवस्थेत सारे काही आलबेल आहे. परंतु, विरोधक सरकारसंदर्भात नकारात्मक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बोलताना केला. 

वरिष्ठ पत्रकार डॉ. झाका जेकब यांनी कायदामंत्र्यांशी संवाद साधला. तेव्हा रिजिजू म्हणाले की, राज्यघटनेने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळाचे अधिकार ठरवून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या अधिकार क्षेत्रात राहूनच कार्य केले पाहिजे. न्यायमूर्तींच्या नियुक्तीविषयी नेमका कायदा अस्तित्वात नसल्याने काही चर्चा होते. तथापि, यावर तत्काळ प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. सरकार न्यायपालिकेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. न्यायालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील न्यायालयांमध्ये विविध कारणांनी पाच कोटी ९० लाखांवर प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालये प्रकरणे वेगात निकाली काढण्यात असमर्थ असल्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप योग्य नाही. दरवर्षी असंख्य प्रकरणे निकाली निघतात; पण त्या तुलनेत खूप मोठ्या संख्येने नवीन खटले दाखल होतात. परिणामी, प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होत नाही. सरकार व न्यायव्यवस्था एकत्र येऊन यावर तोडगा काढू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी सरकारवर आरोप करताना लोकशाही तसेच न्यायव्यवस्थेला बदनाम करीत असले तरी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचीदेखील गरज नाही. ईडी, आयटी व सीबीआय कधीच निराधार कारवाई करीत नाही. भ्रष्टाचार केला की त्याच्यावर कारवाई होणारच. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. सरकारच्या हेतूवर संशय घेतला जातो म्हणून कारवाई थांबणार नाही, असे कायदामंत्र्यांनी स्पष्ट केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड