शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Lokmat Parliamentary Awards: सरकार व न्यायपालिकेत सारे आलबेल, विरोधकच नकारात्मक : किरेन रिजिजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:24 IST

किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बोलत होते. 

भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र होती, आहे व स्वतंत्रच राहील, याची खात्री बाळगा. न्यायालयांच्या अधिकारांमध्ये सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. सरकार व न्यायव्यवस्थेत सारे काही आलबेल आहे. परंतु, विरोधक सरकारसंदर्भात नकारात्मक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बोलताना केला. 

वरिष्ठ पत्रकार डॉ. झाका जेकब यांनी कायदामंत्र्यांशी संवाद साधला. तेव्हा रिजिजू म्हणाले की, राज्यघटनेने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळाचे अधिकार ठरवून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या अधिकार क्षेत्रात राहूनच कार्य केले पाहिजे. न्यायमूर्तींच्या नियुक्तीविषयी नेमका कायदा अस्तित्वात नसल्याने काही चर्चा होते. तथापि, यावर तत्काळ प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. सरकार न्यायपालिकेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. न्यायालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील न्यायालयांमध्ये विविध कारणांनी पाच कोटी ९० लाखांवर प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालये प्रकरणे वेगात निकाली काढण्यात असमर्थ असल्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप योग्य नाही. दरवर्षी असंख्य प्रकरणे निकाली निघतात; पण त्या तुलनेत खूप मोठ्या संख्येने नवीन खटले दाखल होतात. परिणामी, प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होत नाही. सरकार व न्यायव्यवस्था एकत्र येऊन यावर तोडगा काढू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी सरकारवर आरोप करताना लोकशाही तसेच न्यायव्यवस्थेला बदनाम करीत असले तरी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचीदेखील गरज नाही. ईडी, आयटी व सीबीआय कधीच निराधार कारवाई करीत नाही. भ्रष्टाचार केला की त्याच्यावर कारवाई होणारच. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. सरकारच्या हेतूवर संशय घेतला जातो म्हणून कारवाई थांबणार नाही, असे कायदामंत्र्यांनी स्पष्ट केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड